वाचा असे काय घडले की अंत्ययात्रा रस्त्यातच सोडून पळाले शवयात्रेत सहभागी

जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या नगाव गावातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने त्याची अंत्ययात्रा स्मशानभूमी कडे जाण्यासाठी निघाली. स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. अंत्ययात्रा सुरू असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या पारोळा तालुक्यातल्या नगाव गावात ही घटना घटना घडली आहे. स्मशान भूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. अचानक हल्ला झाल्यामुळे नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक वाट सापडेल तिकडे पळत सुटले. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मधमाशांनी हल्ला केल्यानंतर स्वतः चा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी शोकाकुल नातेवाईक मृतदेह सोडून वाट मिळेल तिकडे पळाले. नगाव गावातील स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा जात असताना रस्त्यात अचानक मधमाशांचं पोळं उठल्याने ही घटना घडली. मधमाशांचं पोळ उठलं आणि या मधमाशांनी थेट अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर हल्ला केला. अचानक मधमाशांचा हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. घटनास्थळी धावपळ उडाली. मृतदेह रस्त्यातच सोडून नातेवाईक घटनास्थळावरून वाट दिसेल तिकडे पळत सुटले.
तीन जण गंभीर जखमी
दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर काही जण हे किरकोळ जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. साधु भागा भिल वय 75, ओंकार शंकर भिल वय 65, मधुकर सजन भिल वय 55, तिघे राहणार नगाव ता. पारोळा अशी या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.