शेती विषयक

त्या तरुण शेतकऱ्याच्या नुकसानीची केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली दखल, केला फोन 

Spread the love

नाशिक / प्रतिनिधी 

 मुसळधार पावसात रस्त्यावर ठेवलेला भुईमूग वाहून जात असताना तो अडवण्यासाठी एका तरुण शेतकऱ्याची केविलवाणी धडपड सुरु असल्याचा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

गौरव ऊर्फ इंदल पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याचा व्हिडिओ पाहून थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्याला फोन केला आणि विचारपूस केली. तसंच त्याच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचं आश्वासनही दिलं.

फोनवरुन इंदल पवार आणि शिवराजसिंह चौहान यांच्यामध्ये बोलणं झालं, या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

यामध्ये कृषीमंत्री म्हणतात, कसा आहेस गौरव?

गौरव : मी ठीक आहे सर

चौहान : मी व्हिडिओ पाहिला होता भुईमूग वाहून जातानाचा

गौरव : हो सर, यात माझं बरंच नुकसान झालंय.

चौहान : मला हा व्हिडिओ पाहून खूपच वाईट वाटलं. पण तुम्ही चिंता करु नका कारण महाराष्ट्राचं सरकार खूपच संवेदनशील आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली आहे. तुमच्या मालाचं बाजार समितीत नुकसान झालेलं आहे, त्यामुळं तुम्हाला याची नुकसान भरपाई जरुर मिळेल.

चौहान : येत्या सोमवारपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई मिळावी, तुमच्या कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ नये असा आम्ही प्रयत्न करत आहोत.

चौहान : बाकी कसे आहात?

गौरव : सर त्या दिवशी मी पूर्णपणे पावसात भिजलो होतो त्यामुळं सध्या बरं वाटत नाहीए.

चौहान : ओके, आम्ही तुम्हाला मदत करत आहोत, तुम्ही चिंता करु नका आणि सर्वजण तुमच्यासोबत आहोत.

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नाशिकमधील अवकाळी पावसाचा आढावा घेणार आहेत. अवकाळीनं महाराष्ट्रातील बहुतांश भागात शेतीचं नुकसान झालं आहे. राज्याच्या कृषिमंत्र्यांसह वरीष्ठ अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री व्हीसीद्वारे तर राज्याचे कृषिमंत्री नाशिकमधून बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close