अपघात

असंतुलित कार नदीत पडून पाच लोकांना जलसमाधी 

Spread the love
 औरंगाबाद (बिहार ) / नवप्रहार ब्यूरो
बिहार राज्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे कार असंतुलित होऊन नदीत पडल्याने पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. हे पाच ही लोक तिर्थस्थळावरून येत होते असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
                  घटना औरंगाबाद जिल्ह्यातील दाऊद नगर पो स्टे हद्दीत येत असलेल्या चमन बिगहा गावा नजिकच्या कालव्याजावळ घडली. रस्त्याने जात असलेली एक कार अनियंत्रित होऊन नदीत पडली. सध्या नदीला पुर असल्याने नागरिकांना त्यांना वाचविता आले नाही. वास्तविक कार नदीत पडताना पाहून नागरिक कार मधील लोकांना वाचविण्याच्या उद्देशाने नदी कडे धावले .
             पण नदी दुथडी भरून वाहत असल्याने त्यांनी पुढे जाण्याची हिंमत केली नाही. पाच मृतांमध्ये चार पाटणा तर एक आरा येथील रहिवासी आहे. मृतका मध्ये १६ वर्षीय मुलाचा समावेश आहे. कार चां सेंट्रल लॉक लॉक झाल्याने मृतकाना गाडीच्या बाहेर पडणे अवघड झाले होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close