राज्यातील राजकारणात पुन्हा खळबळ ; महाविकास आघाडीत चिंता
शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे विधान
मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क
पुणे येथे पुलाच्या उदघाटन प्रसंगी च्या कार्यक्रम नंतर अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी भेट होऊन त्यात प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत जयंत पाटील देखील सहभागी होते.शरद पवार यांच्या भूमिकेला घेऊन संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.” यानंतर महाविकास आघाडीत हलचलअंजली आहे. यानंतर नाना पटोले यांनी मातोश्री वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. अश्यातच शिंदे गटाच्या आमदाराने मोठं विधान केल आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर ‘शिवसेना’ पक्ष व आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह यावरून दोन ठाकरे व शिंदे गटात वाद सुरू होता. मात्र निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्वाळा दिला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाचं याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही प्रलंबित आहे. असं असताना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं मोठ विधान केलं आहे.
आमदार किशोर पाटील यांनी म्हटले की, तांत्रिक अडचण आली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हावर म्हणजेच कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरू. याबाबचे निर्णय एकनाथ शिंदे घेतील. ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ,असं किशोर पाटील म्हणाले
‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ आमचीच आहे, यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ९९.९ टक्के भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढण्याची आमच्यावर वेळ येणार नाही. पण जर तांत्रिक अडचण निर्माण झाली, तर कदाचित तसा निर्णय घेतला जाऊ शकतो.
तसेचएकनाथ शिंदे यांनी सांगितल्यासआम्ही अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्यास तयार आहे. एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, आपल्याला भाजपाकडून लढायचं आहे, तर आम्ही भाजपाकडून लढू. आमचे सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे पाटील म्हणाले.