सामाजिक

शहरातील रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका 

Spread the love
नगर परिषदेकडून यावर तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी 
यवतमाळ / अरविंद वानखडे 
                    शहरातील रस्त्यावर पूर्वीच खड्डे होते. अती पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात आणखी भर पडली आहे.या खड्ड्यात पाणी साचले असल्याने याचा अंदाज येत नाही आणि अपघात घडतात. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे शहरवासीयांचा जीव धोक्यात आला आहे. कारण कधी या खड्ड्यांमुळे अपघात घडून येईल आणि त्यामुळे अस्थिभंग किंवा गंभीर स्वरूपाची इजा होईल याचा काहीच नेम नाही.
खड्ड्यांमुळे बांगर नगर येथील अपघात यवतमाळ करांच्या अजूनही आठवणीत असून शहरामध्ये वावरत असताना किंवा फिरत असताना शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठं मोठे गड्डे आढळतात. सततच्या पावसामुळे रस्त्यावरून चौफेर पाणी वाहत असताना हे खड्डे पाण्याखाली येत असल्याने नागरिकांचा अंदाज चुकतो त्यामुळे अनेक अपघात झाल्याचे आढळते.
शहराच्या माध्यभागी असलेल्या नगर परिषद जवळ असलेली पाच कंदील चौक ते तहसील चौक च्या माध्यभागी हा भला मोठा जीवघेणा खड्डा गेल्या अनेक दिवसापासून असाच आहे नागरिकांची अनेक दिवसापासूनची मागणी असून सुद्धा या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते.
न. प. कडून तातडीने पर्यायी व्यवस्थेची मागणी – पावसाळ्यात पॅचेस ची कामे होत नाही हे सर्वादित आहे. पण त्यामुळें हातावर हात देऊन बसने हा पर्याय नाही.नगर परिषदेने यावर काहीतरी पर्यायी उपाय शोधावा अशी रास्त मागणी शहर वासीयांकडून केली जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close