कृषी पंपाची शक्तीची वीज बिल वसुली बंद करा व धनाची खरेदी तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन -बी आर एस नेते चरण वाघमारे

भंडारा- जिल्हा प्रतिनिधी
शेतकरी सुखी तर देश सुखी अशी अपेक्षा सध्यातरी शक्य नाही. एकीकडे शेतकरी संकटात सापडला असतांनाच कृषी पंपाची शक्तीची वीज बिल वसुलीसाठी राज्य सरकारच्या तुघलकी धोरणामुळे बळीराजा पुरता दुखावला असल्याने ही शक्तीची वीज बिल वसुली थांबवावी अशी मागणी बी आर एस नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेतुन राज्य शासनास केली आहे.
शिंदे सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यमान उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतांना राज्य सरकारने शेतकऱ्यांना १६ तास अखंडित वीज पुरवठा करावा,कृषिपंपाची थकीत वीज बिलाची शक्तीची वसुली बंद करुन वीज बिल माफ करण्यासाठी वारंवार मागणी करीत होते.कालांतराने सत्ता बदल घडवून स्वतः मागणी करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाचा कारभार स्वतःकडे ठेऊन शेतकऱ्यांना विजेची गरज नसतांना हिवाळ्यात दिवसा १२ तास वीज पुरवठा करुन वाहवाही लुटुन घेतली. परंतु रब्बी हंगाम सुरु होताच हळुहळु १२ तासावरून आठ तास व तद्नंतर ६ तास वीज देत शेतकऱ्यांची थट्टा करून हातात येणारे पीक उद्ध्वस्त करुन परत शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा महापाप राज्य सरकारने केला आहे. उरलेसुरले पीक हाती आल्यावर केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे एक मे पासुन धान खरेदी केंद्र सुरु होणे आवश्यक असतांना राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खरेदी केंद्रांच्या सुरु होण्याच्या अभावाने विक्रीसाठी उपलब्ध मालाची नोंदणी शेतकाऱ्यांकडून होऊ शकली नाही त्यामुळे अद्यापही शेतकरी धान्य विकु शकला नाही.परिणामी कृषी पंपाची वीज बिल भरणे शक्य नसल्याने परत राज्य शासनाने कृषी पंपाचे कनेक्शन बंद करुन शक्तीची वीज बिल वसुली सुरु केली असल्याने शेतकरी वर्गात शासनाविरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.त्यामुळे राज्य सरकारने धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करुन विकलेल्या धान्याचे चुकारे विनाविलंब २४ तासात शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच शक्तीची वीज बिल वसुली बंद करून वीज पुरवठा खंडित करणे बंद करावे अन्यथा भारत राष्ट्र समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बी आर एस नेते माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतुन राज्य शासनास दिला आहे.