विवाहित महिलेची आत्महत्या घाटंजी शहरातील घटना
तालुक्यातील आत्महत्या सत्रात वाढ
घाटंजी ता प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
घाटंजी :- शहरातील एका विवाहित महिलेची पाण्याच्या तकीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ नगर परिषद पाणी पुरवठा करणारी पाण्याची ठाकी जवळ एका महिलेचा मृतदेह आढळला मृतक प्राजक्ता गजानन राउत वय ३४ रा. आकपुरी ह. मु. घाटंजी असे नाव असून मृतक महिला गेल्या काही दिवसापासून मानसिक व शारीरिक तणावात होती तेव्हा तिचा उपचार यवतमाळ नागपूर येथे सुरू होता. दि.६ मार्च २०२४ रोजी स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीवर चडून अंदाजे ६० फूट अंतरावरून उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गद्शनाखाली पोलीस उपनरीक्षक विलास सिडाम राहुल खंडागळे, विनोद मेश्राम, अमित लोखंडे, करित आहे.
OooooOooo 000000