शेकडो शेतकऱ्यांसह समाजसेवी नितीनजी कदम धडकले महावितरण कार्यालयावर
नितीनजी यांच्या आक्रमक पावित्र्यमुळे विजप्रश्र्न निकाली लागला
प्रतिनिधी / अमरावती
*स्थानिक बडनेरा ग्रामीण भागातील पार्डी गावामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपुऱ्या विद्युत प्रवाह अभावी (लोडशेडींग) प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असताना शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी अथवा निवेदन देऊनही कुठल्याच प्रकारची कारवाही संदर्भातील चिन्हे दिसून येत नव्हती. स्थानिक लोकप्रिनिधींना समस्यासंदर्भात वारंवार सांगना केली असताना आपल्या निष्काळजी स्वभावाची प्रचिती दिली.अश्याताच येथील विद्युत समस्येविषयी विविध प्रश्न घेऊन संबधीत शेतकऱ्यांनी समाजसेवी नितीनजी कदम यांच्याशी संपर्क साधत संपूर्ण वास्तविकता मांडली. नितीनजी यांनी आपल्या सामाजिक कार्याची दखल देतांना पार्डी गावातील शेकडो शेतकऱ्यांसह थेट महावितरण कार्यालय गाठले. संबधीत अधिकाऱ्यांना लोडशेडींग बाबद जाब विचारत चांगलीच कानउघाडणी केली. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांचा जमाव नितीनजी यांनी आटोक्यात घेतं शेतकऱ्यांची भक्कम बाजू मांडत होणाऱ्या लोडशेडींगची समस्या या हंगामात शेतकऱ्यांना किती त्रासदायक आहे याबद्दल माहिती देत अधिकाऱ्यांसमोर विविध प्रश्न मांडले. दरम्यान अधिकाऱ्यांनी नितीनजी यांच्याकडुन समस्या जाणुन घेत आपल्या अनियमित व अनियंत्रित लोडशेडींगचा निर्णय मागे घेत संतप्त शेतकऱ्यांचा जमाव शांत केला. आता गावामधील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यअभावी वंचित राहू नये व असा प्रकार केव्हा घडल्यास आपल्या सेवाकार्याकरिता आम्ही अहोरात्र झटनार असल्याची ग्वाही यावेळी नितीनजी यांनी देऊन सर्व गावकऱ्यांची मने जिंकली. यावेळी नितीनजी यांच्या समवेत स्वप्निल मालधुरे,अभिषेक सवाई,डॉ. मधुकर पिसे , पांडुरंग बाडाबुचे, अशोक ठाकरे, नितीन भेंडे, अक्षय मेश्राम, विनोद ठेंबरे, कैलास गीरी, सुरेंद्र ठाकरे, प्रदीप ठाकरे, सुधीर ठेंबरे, निलेश वघरे, अतुल महल्ले, जीवन ठाकरे, अमोल चांदणे, कृष्णा मेश्राम, दिवाकर राऊत, पांडुरंग पुरळकर, प्रविण पिंगळे, नितीन भेंडे, राजेन्द्र ठाकरे, सुनील राउत, गोपाल बघरे, किशोर कोरडे, संघापाल सरदार, संजय सदावर्ते, अशोक ठाकरे, रावसाहेब ठाकरे, मुकुंद होळकर यांच्यासमवेत शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.*