यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडुन शिष्यवृत्तीचे वाटप…
तिवसा- प्रतिनिधी
– स्थानिक वाय डी व्ही डी कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा जि अमरावती आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा. प्राचार्य डॅा.एच.आर. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत महाविद्यालयात प्रवेशित बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी, च्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाच्या (FAREWELL) कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हनुन बोलतांना जेष्ठ साहीत्यीक तथा माजी सचिव,
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती
मा. श्री शेषरावजी खाडे यांनी वरील प्रतिपादन केले.याप्रसंगी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा एच आर देशमुख, मा. वैभव मस्के, मा. शंतनु देशमुख, दै पुण्यनगरी चे पत्रकार मा. हेमंत निखाडे कार्यक्रमाचे समन्वयक प्रा राहुल माहुरे, वर्ग प्रतिनिधी गौरी उल्हे, आरती जारेवार, रिधा परवीन पठाण उपस्थीत होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परियच प्रा सी जी सोळंके यांनी करुन दिला. व महाविद्यालयाच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा त्यांनी मांडला.
त्यांनंतर बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. अंतिम वर्षांचे विद्यापिठ परीक्षा हिवाळी २०२२ (५ सेम) व उन्हाळी २०२२ (४ सेम) तसेच एम.ए. अर्थशास्त्र करीता २ सेम व ३ सेम या दोन्ही परीक्षेमध्ये पास गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील कार्यरत
कर्मचा-यांकडुन जमा केलेल्या रक्कमेमधुन प्रति विद्यार्थी रु १००० ₹ स्कॅालरशीप देण्यात आली आणि पालकांसह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी अनुक्रमे पुढीलप्रमाणे होते.
कु आचल रोडगे, अनुप राऊत, गौरव बऱ्हाणकुळे, कु गायत्री शेळके, कु कल्याणी सावरकर, कु परमेश्वरी शेलोटकर, रिदा पठाण, कु रोहीणी हिरवे, ऋषिकेश क्षिरसागर, कु स्नेहा देशमुख, कु स्वप्नाली निमकर, कु नितल जुनघरे, कु वैष्णवी इजापुरे, प्रथमेश डोंगरे, कु रुपाली जारेवार, कु गौरी उल्हे, कु वैष्णवी डोळस, कु रेवती वानखडे, कु निकीता डगवार.
तसेचं कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात कु रेवती वानखडे आणि कु परमेश्वरी शेलोटकर यांनी आपल्या महाविद्यालयातील आठवनी मनोगतातुन मांडल्या. यांनतर मा. वैभव मस्के आणि शंतनु देशमुख यांची समायोचीत भाषणे झाली.
प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते म्हनुन बोलतांना मा. शेषराव खाडे म्हणाले की, आज देशातील परिस्थिती बघता विद्यार्थ्यांमध्ये मुल्यशिक्षणाची मुल्ये जोपासणे गरेजेचे आहे. जुन्या काळाच्या गोष्टींना वैज्ञानिक विचारांची जोड देवुन जीवनात कार्य करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. परिस्थिती मानवी प्रगतीत बाधा नसते. म्हनुन मिळालेल्या संधीचे सोने करा. एक भारतीय म्हणुन आपले हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याची जाणीव ठेवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी मनापासुन मेहनत करा हे पटवुन देतांना त्यांनी अनेक प्रसंगानुरुप उदाहरणे सांगीतली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॅा एच आर देशमुख यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातुन राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहीती दिली. आणि भविष्यात राबविण्यात येणारे नविन प्रोजेक्ट या विषयी सांगितले. संस्थेच्या भरघोस सहकार्यामुळे येणाऱ्या काळात महाविद्यालयाची प्रगती दैदीप्यमान होईल असा आशावाद त्यांनी मांडला.
सदर कार्यक्रमानिमित्य अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरीता सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.।कार्यक्रमाचे संचालन कु आरती वरघट तर आभार प्रदर्शन कु अनु खंडारे यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक तसेचं शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.