Uncategorized

अंजनगाव सुर्जी येथील महाराष्ट्र बँकेचा शेतकऱ्याचा जीव घेण्याचा प्रकार

Spread the love

परवानगी न घेता
शेतकऱ्याच्या दोन लक्ष जमा ठेव पीक कर्जात पैसे केले वळते
आमदार बळवंत वानखडे यांनी घेतली तात्काळ दखल

व्यवस्थापकास खडसावून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अंजनगाव सर्जी (मनोहर मुरकुटे )

2019 मधील पीक कर्जाच्या माफीसाठी पात्र असतानाही माफी न झाल्यामुळे शेतकऱ्याने म्हातारपणीची ठेव म्हणून जमा केलेल्या फिक्स डिपॉझिट मधूनच पीक कर्जाची रक्कम परस्पर कपात केल्याचा गंभीर प्रकार येथील महाराष्ट्र बँकेने केला असून शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक प्रशासना विरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असा संतप्त सवाल आज दिनांक 10 ला आमदार बळवंत वानखडे यांनी संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला खडसावताना केला असून सदर घटनेने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील शेतकरी रमेश गणपत सावरकर यांनी महाराष्ट्र बँक शाखा अंजनगाव येथून सन 2016 मध्ये 95 हजार 668 रुपये पीक कर्ज काढले होते परंतु सततच्या नापिकीमुळे आणि अल्पभूधारक असल्यामुळे ते पीक कर्ज भरण्यास असमर्थ ठरले अशातच 2019 मध्ये दोन लक्ष रुपये पर्यंत कर्जमाफीची योजना झाल्यामुळे आपण कर्जमाफी पात्र असल्यामुळे आज ना उद्या कर्जमाफी होईल या आशेवर शेतकरी रमेश सावरकर यांनी कर्ज भरले नाही परंतु बँकेने कोर्टाच्या नोटीस पाठवणे सुरू केले अशातच त्या शेतकऱ्याला लोकन्यायालयात बोलावून तुमचे खाते 72 हजार रुपयात सेटलमेंट करून देतो असे आश्वासन बँक व्यवस्थापकाने दिले व शेतकऱ्यांच्या काही कागदावर सह्या घेतल्या त्यानंतर शेतकरी सावरकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते बँकेत जाऊ शकले नाही परंतु महाराष्ट्र बँकेने 31 मार्च 2023 ला शेतकरी रमेश सावरकर यांनी बँकेत ठेवलेल्या दोन लक्ष रुपयांच्या फिक्स डिपॉझिट मधून एक लक्ष एक्याऐंशी हजार रुपये परस्पर पीक कर्जाच्या खात्यात वरती केले ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर शेतकरी बँकेसमोर आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला असताना त्यास येथील काही स्थानिक पत्रकारांनी त्यापासून वाचवले या गंभीर बाबीची माहिती आमदार बळवंत वानखडे यांना कळतात कुठलाही विलंब न लावता आमदार वानखडे यांनी महाराष्ट्र बँक गाठली आणि महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापकास चांगलेच खडसावले व शेतकऱ्यांच्या फिक्स डिपॉझिट मधून परस्पर रक्कम का वळती केली असा सवालही बँक व्यवस्थापकास करून सदर बाब तातडीने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या कानावर टाकुन संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली.
महाराष्ट्र बँकेने याही अगोदर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कोर्टाच्या नोटीस पाठवून शेतकऱ्यांना मानसिक त्रास दिला होता याबाबतची लक्षवेधी विधानसभेत आमदार बळवंत वानखडे यांनी केली होती हे विशेष !
आज घडलेल्या या प्रकारानंतर अशा बँक व्यवस्थापकावर कारवाई होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे
बँकेने परस्पर शेतकऱ्याची कुठलीही परवानगी न घेता हीच डिपॉझिट मधून पैसे कपात करणे म्हणजे शुद्ध दरोड्यासारखा प्रकार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. शासनाचे निर्देश असतानाही मुजोरी करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आ. बळवंत भाऊ वानखडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सदर घटनेने संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जमाफीस पात्र असलेल्या
एका गरीब शेतकऱ्याची फिक्स डिपॉझिट असलेली रक्कम शेतकऱ्याला कुठलीही पूर्वसूचना न देता परस्परपणे शेतकऱ्याच्या थकीत कर्जात वळती करणे ही अतिशय गंभीर बाब असून शासन स्तरावर या बाबीची मी तक्रार करणार आहे.
*आमदार बळवंत वानखडे दर्यापूर मतदार संघ*

 

या संदर्भात महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक रुपेश नंदनवार यांच्याशी संवाद साधला असता ही संपूर्ण कारवाई मी बँकेच्या नियमाप्रमाणे केली केली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बँक ऑफ महाराष्ट्र अन्याय केलेल्या लखाड येथील गरीब कास्तकार रमेश सावरकर यांना आत्महत्या करण्यापासून स्थानिक पत्रकारांनी रोखून त्यांना या विचारांपासून परारुत्त केल्याबद्दल आमदार बळवंत वानखडे यांनी सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close