काठआमाला – उत्तमसरा रस्त्याचे बांधकाम अखेर सुरु
नितीन कदम यांच्या प्रयत्नांना यश : नागरिकांची रस्त्याविषयीची प्रतीक्षा संपली
प्रतिनिधि / अमरावती
*गेल्या कित्येक वर्षांपासून ऐरणीवर असलेला काठआमाला – उत्तमसरा रस्त्याचा प्रश्न निकाली लागला आहे. नितीन कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याचे बांधकाम अखेर सुरु झाले असून जलदगतीने व्हावा याकरिता विशेष काळजी यावेळी नागरिक व श्रमिक घेतं आहेत.
दरम्यान येथिल काठआमाला – उत्तमसरा मार्गावर दिवसाढवळ्या या रस्त्यांवरुन प्रवास करताना येणाऱ्याजाणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत धरुन मार्ग शोधावा लागत होता. एखादा वेळेस आपतकालीन रुग्ण बाहेर घेऊन जायचे असल्यास रुग्णाचा रस्तेवाटेतच मृत्यु होण्याची शक्यता होती. या रस्त्यावर वाहनचालक आणि पादचाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता. सदर रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला होता. काहीं वर्षापूर्वी आधीच या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आढळून आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नितीन कदम यांनी याआधी सूचना केल्या होत्या.
येथील दळण – वळण वाहतूक करणाऱ्या नागरीकांना मोठ्या तारेवरची कसरत करावी लागत होती.
परंतु आता नितीन कदम यांच्या सातत्याने करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याचे बांधकाम सुरु झाले असून लवकरच येथिल नागरीकांना वाहतुकीकरिता सोयीस्कर उत्तम काठआमाला – उत्तमसरा रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांच्या या कौतुकास्पद बाबीमुळे लोकप्रियतेचा उच्चांक गाठताना दिसुन येत आहे