क्राइम

जंगली  जनावरांची शिकार करण्यासाठी रात्रीतून जाणे अंगलट ; दोन मित्रांनी गमावला जीव .

Spread the love

वर्धा / नवप्रहार मीडिया ऑनलाईन 

                  रात्री वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी जाणे चार मित्रांपैकी दिन मित्रांच्या अंगलट आले आहे.शिकारी साठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार गिरड येथील  उत्तम संभा जांभुळे, अखिल बावणे, बादल खडसे व विकास नांनवरे हे वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी गिरड शिवारात गेले होते. ते शेतकरी अनिल गौरकार  यांच्या शेतात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसले.

              अनिल गौरकार यांनी जंगली प्राण्यांपासून पिकाच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण घातले होते.ते रात्री त्यात विधुत प्रवाह सोडायचे. याची या लोकांना कल्पना नव्हती. त्यामुळे यापैकी दोघे तारेजवळ गेल्यावर  उत्तम जंभुळे व अखिल बावणे यांना विजेचा झटका बसला. ते जोरात किंचाळले. त्यांचा आवाज ऐकून इतर दोघे धावत आल्यावर त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला.

याची रात्रीच चर्चा झाल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले. धक्का लागलेल्या दोघांना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गुजर यांनी दोघांनाही मृत घोषित केले. घटनेचा पंचनामा करीत असताना पोलिसांना कुंपण तारात वीज प्रवाह सोडल्या जात असल्याचे दिसून आले. या ठिकाणी शिकार करण्यासाठी आणलेले जाळे, बझर लाईट, बॅटरी, टेस्टर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी तपासाबाबत पुढील सूचना केल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close