शेती विषयक

या तारखेनंतरच राज्यात पावसाची हजेरी ; हवामान तज्ञांचा अंदाज 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

                    राज्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून पाहत आहे. राज्यात अध्याप मान्सून चे आगमन झाले नसले तरी राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडला आहे. पाऊस न पडल्याने राज्यातील अनेक भागात उकाडा वाढला आहे.पावसाचे आगमन व्हावे असे सर्व सामान्यांना वाटत असले तरी हवामान तज्ञांच्या मते राज्यात 20 जून नंतरच पाऊस पडणार आहे.

विदर्भात 20 जून पर्यंत पेरणीयोग्य पावसाची शक्यता

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 22 जून पर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये पाऊस विश्रांती घेऊ शकतो. मात्र, महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा खंड राहणार नसल्याचे पंजाबराव डख म्हणाले. विदर्भात 22 जून पर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भात 20 जून पर्यंत पेरणीयोग्य पावसाची शक्यता आहे.

यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यात जोरदार पावसाची शक्यता

यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत यंदा गेल्या वर्षी सारखी परिस्थिती राहणार नाही. यंदा एल निनोची स्थिती नाही. त्यामुळं पावसाचं प्रमाण चांगलं राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये

दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागातील शेतकरी पेरणीच्या कामांना लागले आहेत. मात्र, अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी

दरम्यान, यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल आहे. दरवर्षी जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात चांगला पाऊस होत असतो. मात्र, यावेळी जून महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मान्सून देखील हळूहळू संपूर्ण राज्यात सक्रीय होत आहे. त्यामुळं पुढच्या काही दिवसात म्हणजे 22 तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close