विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा
विविध कार्यक्रमाचे आयोजन
सैनिक हा देशासाठी किती महत्त्वाचा हे लक्षात घेऊन सैनिकांचा सन्मान राखा
– कॅप्टन राहुल कुकडे
युवकांनी स्वतःला घडवून विविध माध्यमाने देश सेवेचे कार्य करणे महत्त्वाचे – राजेंद्र जोशी
धामणगाव रेल्वे
कारगिल विजय दिवस ही भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. आजपासून २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले. त्यानंतर २६ जुलै या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून कारगिलच्या पर्वतरांगांवर पुन्हा आपला तिरंगा फडकवला. यामुळे दरवर्षी २६ जुलै हा दिवस आपण ‘कारगिल युद्ध दिवस’ म्हणून साजरा करतो. हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर जवानांची आठवण करुन देतो. या घटनेला 25 वर्ष पूर्ण होऊन रौप्य महोत्सवी दिनाचे औचित्य साधता निमित्ताने धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी माजी सैनिक कॅप्टन राहुल कुकडे यांचे हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे संचालक राजेंद्र जोशी व प्राचार्य रवी देशमुख उपस्थित होते. वर्ग ७ चा कृष्णा भारुका या विद्यार्थ्याने कारगिल विजय दिवसानिमित्त भाषण व्यक्त केले. वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी ओ देश मेरे, तेरी शान पे सजके या गीतावर नृत्य सादर केले. तर वर्ग ६च्या विद्यार्थ्यांनी तेरी मिट्टी मे मिल जावा हे देशभक्तीपर गीत सादर केले. यानंतर कॅप्टन राहुल कुकडे यांनी सैनिकांच्या जीवनावर प्रकाश टाकत. सैनिक हा देशासाठी किती महत्त्वाचा हे लक्षात घेऊन सैनिकांचा सन्मान राखा असे प्रतिपादन केले. तर दिवसाची रात्र करून कोणत्याही संकटांना न जुमानता सैनिक देशाच्या संरक्षणासाठी लढतात तर युवकांनीही स्वतःला घडवून विविध माध्यमाने देश सेवेचे कार्य करणे महत्त्वाचे असे शाळेचे संचालक राजेंद्र जोशी यांनी उपस्थितांना संबोधले. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पूजा कुथे यांनी केले तर आभार प्रदर्शन चारुलता दारोकार यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट भारत माता की जय या जयघोषाने करण्यात आला.