मुस्लिम समाजाचे कोल्हापूर येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध
बिलोली(प्रतिनिधि):
तहसील कार्यालय, बिलोली समोर एम.आय.एम , राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने कोल्हापूर येथील घटनेचा जाहीर निषेध करुन धरणे आंदोलन करण्यात आले या वेळी मोठ्या संख्येने नागरिक, युवा वर्ग उपस्थित होते. कोल्हापुर जिल्ह्यातील विशालगडाच्या अतिक्रमणाच्या नावाने सुरु असणा-या आंदोलनात दि.१४ जुलै २०२४ रोजी काही समाजकंटकांनी पद्धतशीर नियोजनबध्दपणे मोर्चेचे नियोजन केले होते. सदर मोर्चेला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले व गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील घरांवर दगडफेक, प्रार्थनास्थळावर दगडफेक, तोडफोड आई-बहीण व लहान मुलांवर क्रूर पध्दतीने मारहाण करण्यात आले आहेत.
हे कृत्य पुरोगामी कोल्हापूर आणि महाराष्ट्रला अशोभनीय आहे. सदर जमावबंदी आदेश असताना सदर मोर्चा निघाला कसा? तसेच विशाळगड अतिक्रमण काढणेसंदर्भात मोर्चेचे नियोजन केले होते. त्यांच्याकडून मस्जिद वर हल्ला झाला. गजापूरमध्ये अतिकमणाचा कोणताही विषय नसताना मुस्लिम समाजाच्या वस्तीवर हल्ला करण्यात आले.
सदर घटनेमुळे कोल्हापूरात जातीय तणाव झाला. भारतीय संविधानानुसार कडक कलमे लावून सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर तलवारहल्ला, महिलांचे विनयभंग तसेच जीवे मारणेच्या उद्देशाने हल्ला घरफोडी व लुटालुट, प्रार्थनास्थळावर दगडफेक, धार्मिक ग्रंथ पेटवणाऱ्यांवर समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले. समाजकंटकावर कठोर शासन व्हावे, अशी विनंती आहे. उपरोक्त घटनेवर कडक कारवाई झाली नाही तर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तहसीलदार बिलोली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी
मौलाना मुबीन खान, अ.गफुर कुरेशी, गौसोदीन कूरेशी , स.मुफ्ती युनुस, मौलाना जुबेर, शेख पाशा गादीवाले, सय्यद रियाज, शेख वाजीद, शेख मोहसीन, रफीक ईनामदार, शेख रशीद सेठ, एजाज फारुखी, महेमुद चाउस, सैफ पटेल अदी धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी
एम. आय. एम. चे शहराध्यक्ष सय्यद फिरदोस,अजीम लाल कुरैशी, सय्यद हैदर, गौस कुरेशी, शेख इरफान, शेख महेबुब, शेख अश्रु अदीनी परिश्रम घेतले .