क्राइम

तिला त्यांच्या मैत्रीवर होती शंका ; तिने तिला घरी बोलावून भावाच्या मदतीने संपवले 

Spread the love

बोकारो  / नवप्रहार मिडिया

                म्हणतात न की शंका हा असा आजार आहे ज्यावर आजपर्यंत औषध सापडलेले नाही . शंका ही मनुष्याला आतल्या आत पोखरत जाते. आणि त्यात मनुष्याचे मानसिक संतुलन ढासळते.व त्याच्या हातून नकळत गंभीर घटना घडते. अशीच घटना झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यात घडली आहे.

आरोपी महिलेच्या पतीशी एका तरुणीची सोशल मीडियावर  ओळख होऊन मैत्री झाली होती. त्यामुळे त्यांचे एकमेकांशी मोबाईल वर बोलणे सुरू होते. आरोपी महिलेला त्यांच्या मैत्रीवर शंका होती. त्यामुळे तिने तिला घरी बोलावून हत्या केली. व मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  राखी शंकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या भावाने सांगितले की, झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यामधील निवासी रवि शंकर यांची पत्नी राखी शंकर नोएडाच्या आनंद गर्ल्स होस्टेलमध्ये वार्डन म्हणून कार्यरत होती. इंटरनेटच्या माध्यमातून ती रामकृष्ण उपाध्याय उर्फ फौजी आणि त्याच्या कुटूंबाच्या संपर्कात आली होती.

रामकृष्ण फौजी सीआरपीएफमध्ये हेडकांस्टेबल असून तो जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. राखी शंकरचे रामकृष्ण उपाध्यायच्या घरी येणे-जाणे होते. राखीचा भाऊ राहुलने फौजीची पत्नी प्रीति उपाध्याय आणि तिच्या भावावर बहिणीच्या हत्येचे आरोप केला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रीति आणि तिचा भाऊ सुबोध कांत मिश्रा याला अटक केली आहे. पोलीस तपासात प्रीतिने कबूल केले आहे की, राखी शंकर व तिच्या पतीचे प्रेमसंबंध सुरू होते. तिला मार्गातून हटवण्यासाठी तिला फोन करून घरी बोलावले. राखी ३ फेब्रुवारी रोजी घरी आली होती. चार फेब्रुवारी रोजी तिची हत्या केली. तिच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली.भावाच्या मदतीने मृतदेह बाइकवरून जंगलात नेऊन फेकला. पोलिसांनी बाईक व हत्यार जप्त केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close