क्राइम

हिंदू मुलीशी लग्न करणाऱ्या एमआयएम च्या जिल्हाध्यक्षाची विटेने  ठेचून हत्या

Spread the love

लखनऊ  / नवप्रहार डेस्क 

                 हिंदू मुलीशी लग्न करणाऱ्या एमआयएम च्या जिल्हाध्यक्षाची हत्या सासरच्या लोकांनी घरी बोलावून आणि जेवणात गुंगीचे औषध देऊन विटांनी ठेचून हत्या केली आहे.  हत्या केल्यानंतर मृतदेह तळघरात फेकून तो झाकून ठेवला. या प्रकरणी पोलिसांनी सासु सासऱ्याला अटक केलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाबरपूरच्या अशोकनगर इथला अरविंद यांच्या घरी बिंदकीच्या मिराजचं येणं जाणं होतं. औवैसी यांच्या एमआयएम पक्षाचा जिल्हाध्यक्ष असलेला मिराज आणि अरविंद यांची मुलगी गोल्डी यांच्यात मैत्री झाली. हे समजताच अरविंद यांनी मुलीचं लग्न दुसरीकडे ठरवलं. लग्नानंतर घरी आलेली गोल्डी मिराजसोबत पळून गेली आणि कोर्ट मॅरेज केलं.

कोर्ट मॅरेज केल्यानंतर मिराज आणि गोल्डी अरविंद यांच्या घरी आले. चारच दिवसांपूर्वी ती माहेरी आली होती. तेव्हा गोल्डीच्या आईने जावई मिराजलासुद्धा घरी बोलावलं. मिराजने येण्यास नकार दिला तेव्हा गोल्डीच्या आईने आता सगळं ठीक झालंय, जावई म्हणून तुझा स्वीकार केलाय असं सांगितलं. मिराज बुधवारी सायंकाळी त्याच्या सासरी पोहोचला.

सायंकाळी जेवण खाल्ल्यानंतर गोल्डी तिच्या खोलीत गेली. यानंतर सासू ज्योतीने मिराजला नशेचं औषध पाजलं. जावई बेशुद्ध झाल्यानंतर अरविंद आणि ज्योती यांनी विटांनी ठेचून त्याची हत्या केली. तर गुरुवारी सकाळी ज्योती गोल्डीला घेऊन घरातून निघून गेली. सायंकाळी अरविंद यांनी दारू पिऊन गोंधळ घातला आणि बेसमेंटमध्ये कुणाचा तरी मृतदेह असल्याचा आरडाओरडा केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची ओळख पटवली. मिराजच्या भावाने यानंतर अरविंद आणि ज्योती यांच्याविरोधात तक्रार दिली. शेवटी शुक्रवारी सायंकाळी दोघांना अटक करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close