संपूर्ण व्यवस्थापनाच्या शाळेत आता शिकाऊ शिक्षक
मुख्याध्यापकांचा ताप वाढणार
*निवड प्रकियेत स्थानिक राजकारणाचा हस्तक्षेप. झाल्यास भविष्यात शाळेची डोकेदुखी वाढणार
आर्वी / .भरत जैसिगपुरे..
.. राज्य शासनाने भविष्यातील आव्हाने ओळखून कार्य प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या, अधिकाअधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी,”मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता जिल्हा परिषद व इतरही व्यवस्थापनाच्या शाळावरही शिकाऊ शिक्षक नियुक्त करण्यात येणार असून, त्यांना रोजगार उपलब्ध होणार असला तरीही, या प्रकियेत स्थानिक राजकारणांचा वारेमाप हस्तक्षेप झाल्यास, शाळेच्या मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढू शकते??
.. वस्तुतः युवकांना रोजगारक्षम,बनविण्यासाठी व.रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यांचा कौशल्य विकास करणे, ही काळाची गरज आहेत. तदवतच भारताच्या एकुण लोकसंख्येच्या प्रमाणात युवकांची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहेत, त्यापैकी व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले फक ४%युवक आहेत. या युवकांना भविष्यात रोजगारक्षम बनवायचे असेल तर त्यांच्यातील सर्वागीण विकास करणे गरजेचे आहे.
..कौशल्य विकास विभागातर्फे विविध कार्यक्रम राबविले जातात, त्याचाच हा एक भाग म्हणून इंटर्नशिपव्दारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला तर प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून, युवकांची रोजगारक्षमता वाढीस लागेल. भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी मिळेल या धर्तीवर ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहेत.
..दरम्यान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विशेष बाब म्हणून शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, विविध शैक्षणिक संस्था मध्ये देखील शिक्षक, शिक्षकेतर प्रशिक्षणार्थी उमेदवार घेता येणार आहेत, त्यामुळे बारावी तसेच पदवी उत्तीर्ण उमेदवारांना शाळेत निवड करण्यामध्ये स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांकडुन मोठा राजकीय हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहेत??
मुख्याध्यापकांची भविष्यात मोठी डोकेदुखी वाढणार आहेत, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळामध्ये सुरू आहेत.
काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य. प्रशिक्षण योजना
राज्यातील नव युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे,प्रशिक्षण ,त्याची नौकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी,”मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र
शासनाने २०२४-२०२५ ;या आर्थिक वर्षांपासून सुरु करण्यास मान्यता. दिली आहेत
निवडीचे संपूर्ण अधिकार शाळेच्या मुख्याध्यापकांना
शाळांमध्ये सहा महिने कालावधीसाठी या प्रशिक्षणार्थी उमेदवारांची.निवड केली. जाणार आहेत. शिवाय उमेदवार.निवडीचे हे अधिकार, त्या-त्यामुळे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात येणार. असल्याने सर्वच मु.अ.ची डोकेदुखी भयंकर. वाढणार आहेत. कारण यात स्थानिक. राजकारणाचा विचार करता, हस्तक्षेप होण्यासाठी मोठा. वाव मिळणार आहेत.
प्रत्येक शाळेत. शिकाऊ शिक्षक प्रशिक्षणार्थी बेरोजगार उमेदवार निवडताना ,निश्चितच शाळेच्या मुख्याध्यापकावर मोठा स्थानिक राजकीय दबाव येतो, या निर्णयामुळे आमच्या शाळेच्या मु.अ च्या अडचणीत आणखी वाढ होणार आहेत. असे असले तरीही शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळेत कंत्राटी पद्धतीने. शिक्षकांची.भरती न करता, जुन्या कायमच्या पद्धतीने शिक्षकांची पदे भरण्यात यावीत, अशी आमची मागणी शासनाला
आहेत, ती मागणी पुर्ण करण्यात यावीत.
मंगेश कोल्हे
शिक्षक मित्र परिवार संघटक प्रमुख आर्वी जिल्हा. वर्धा
शासन विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित करत असते, त्या मध्ये समाजातील सर्वच घटकांचा साकल्याने विचार करून योजना राबविल्या जाते. अर्थातच शाळेच्या मुख्याध्यापकांनी शासनाने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे,पारदर्शक पद्धतीने व शैक्षणिक. गुणवत्तेच्या आधारावरच पुढे प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड करावी. जेणेकरुन कोणताही वाद निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. परंतु असे असले तरीही या निवड प्रकियेचा संपूर्ण भार शाळेच्या मुख्याध्यापकावर.न ठेवता, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवर सोपविण्यात यायला हवा.
अविनाश ल टाके
शिक्षक आर्वी जि. वर्धा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना युवकासाठी रोजगार निर्माण करणारी असली,स्थानिक उमेदवार निवडीचे निकष अद्यापही मुख्याध्यापकांना अडचणीचे ठरणार आहेत. प्रत्येक. गावात. स्थानिक परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे. या निवडीसाठी मुख्याध्यापकांची मोठी छमछाक होणार आहेत. त्यामुळे. ही निवड वरिष्ठ पातळीवर झाल्यास योग्य ठरेल.
निलेश पंजाबराव ढोकणे
पदवीधर शिक्षक