शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ घाटंजीत शिवसेचा चक्का जाम
घाटंजी यवतमाळ राज्य महामार्ग रस्त्यावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रस्तारोको.
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
सध्या शेतकरी परिस्थीती बीकट आहे. दीपावळी हंगामाचे दिवस असुनही शेतकऱ्यांचे शेतीचा माल अद्याप पर्यंत मार्केटमधे आला नाही त्यात शेतकऱ्यांचे मालाला लागवडीसाठी आलेल्या खर्चा पेक्षा कवडीमोल भाव लावल्या जातो.एकीकडे खर्च ज्यास्त उत्पन्न कमी त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकर्या च्यां मागण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने घाटंजीतील यवतमाळ मार्ग येणारा मुख्य रस्त्यावर जवळ जक्काजाम केला.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे त्यासाठी घाटंजी ता.अध्यक्ष मनोज ढगले यांच्या मार्गदर्शनात शेतकर्यांच्या विविध मागण्या लाऊन धरत चक्क जाम आंदोलन करण्यात आले. यात कापूस ,सोयाबिन ला योग्य भाव द्यावा, शेतकर्यांना 8 तास विज देण्यात यावी ,अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात यावी,केंद्र सरकार ने केलेला आयात कर तात्काळ रद्द करावा, शेतकऱ्यांना पिकविमा तात्काळ देण्यात यावा, ईत्यादी मागण्यासाठी बहूसंख्य कार्यकर्ते रस्तारोकोत सहभागी झाले.आंदोलनात तालुका प्रमुख मनोज ढगले, अभिजीत निमकर विभाग प्रमुख,शहर प्रशांत मस्के, दत्ता गटलेवार,व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी व महीलांची बहूसंख्य प्रमाणात उपस्थिती होती.
000000000