सामाजिक

भाजीपाल्यांच्या दरवाढीने* गुहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले

Spread the love

महागाईच्या भडक्याने महिला वर्ग चिंतातुर

प्रतिनिधी:आर्वी
साप्रंत स्थितीत भाजीपाला व इतर धान्याचे भाव गगनाला भिडल्याने,मध्यम वर्गातील लोकांना व गरिबांना महागाईचा जबर फटका बसला आहेत. यामुळे सर्वसामान्य गुहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट फार बिघडले आहेत.
यावर्षी पाऊस मध्येमध्ये उघडझाप करीत असल्यामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक कमी होऊन भावात प्रचंड तेजी आली आहे. सर्वात जास्त लसूण, अद्रक, कांदे, मिरची, टमाटे, वांगे, गवार, भेंडी, फुलकोबी, कोशिंबीर यांचे भाव कडाडले असुन इतर भाजीपाला ही महाग झाला आहेत.
जवळपास सर्वच भाजीपाल्याचे भाव वाढत असतांना टमाटर च्या भाववाढीमुळे महिलांच्या डोळ्यात अश्रु दाटून येत आहे. रोजच्या आहारातील कांद्याचे भाव सुध्दा गगनाला भिडत असल्याने, कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झाला असला तरी दलालांनी त्यालाही अंधारात ठेवून आपले चांगभलं केले आहे. तदवतच इंधनापासुन गँस सिलेंडर ची किंमत सुध्दा वाढल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहेत. वातावरणातील नैसर्गिक चक्राच्या बदलामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसत असुन उत्पादनात मोठी घट झाली आहेत. त्यामुळे सर्वत्र लहान:-मोठ्या शहरांमध्ये व विशेषतः ग्रामीण भागामध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहेत.
आता टमाटर100/रुपये किलो, अद्रक250 रुपये, मिरची200रुपये, कोथिंबिर 400रुपये, गवार,100/रु. कारले,80रुपये, शेवग्याच्या शेंगा100रुपये, भेंडी80रुपये, लिंबू प्रति5रुपये नग असे भाव पाहायला मिळत आहे. बहुधा येणारे एक-दोन महिने भावात घसरण होण्याची शक्यता दिसत नाही. मटण, मासे, डाळीचे भाव सुध्दा मोठ्या प्रमाणात वधारले आहे. तुरदाळिचा भाव गगणाला भिडला असुन तुरदाळ१६०/रुपये दराने विकत घ्यावी लागत आहेत?? मागे काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर इतके कोसळले होते की बाजारातुन टमाटर फेकून देण्याची वेळ कास्तकार बंधुवर आली होती. आता मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत असला तरीही बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम होउन उत्पादनात मोठी घट झालेली आढळून येत आहे. म्हणून भाववाढ होत असली तरीही बळीराज्याच्या पदरी निराशाच दिसून येत आहेत. त्यामुळे या भाववाढीवर नियंत्रण येणे गरजेचे आहेत.साठेबाजी करणाऱ्या तथाकथित दलालांना वठणीवर आणणे गरजेचे आहेत
*प्रतिक्रिया*
आता आम्ही बाजारात फेरफटका मारला असता,सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत, त्यामुळे कोणती भाजी विकत घ्यावी, असा आमच्या महिला वर्गाला प्रश्न पडतो, आधी यापूर्वी200रुपयामध्ये सर्व बाजार व्हायचा, आता मात्र तो500रुपयांचे वर गेला आहेत. त्यामुळे शासकीय. व प्रशासकीय यंत्रणेने योग्य समन्वय साधुन महागाईवर नियंत्रण ठेवावे, व साठेबाजी करणाऱ्या लोकावर अंकुश ठेवावा!तसेच शेतकऱ्यांना सुद्धा योग्य भाव मूल्य मिळावे, अशी अपेक्षा करते.तसेच रोजच्या जीवनातील आवश्यक असलेल्या सिलेंडर चे भाव कमी करण्यात येवून महिलांना एसटी बसमध्ये सवलत देण्यापेक्षा सिलेंडर चे भाव कमी करण्यात येवून महिलांना भाववाढीच्या जाचातून मुक्त करायला हवे, असे माझे प्राजंळ मत आहेत…
सौ.मंजूषा अविनाश टाके
आर्वी जिल्हा वर्धा
*प्रतिक्रिया*
सध्या भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याने आमच्या महिला वर्गाला महागाईचा सामना करावा, लागत आहेत. विशेषतः टमाटर च्या भावाने महिलांच्या डोळ्यात अश्रु निर्माण झाले असुन ,गरिबांच्या रोजच्या जिवनातील कोथिंबीरचा व लसूणाचा भाव वाढला आहेत. त्यामुळे शासनाने महागाईवर नियंत्रण समिती बसवुन भाजीपाला व डाळीच्या भावावर नियंत्रण ठेवावे, अशी महिला वर्गाची मागणी आहेत.
*सौ* *सुनिता*अरुण कहारे*
साईनगर आर्वी जिल्हा वर्धा

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close