राजकिय

उमेदवाऱ्याच्या जाहिरनाम्याची सर्वत्र चर्चा ,: मतदार भाळले 

Spread the love
प्रस्थापितांना नवख्या उमेदवारा कडून कडवे आव्हान 
वर्धा / नवप्रहार डेस्क 
                         लोकसभेचा प्रचार जोमात सुरू आहे. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवार आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे. अश्यातच वर्धा मतदार संघात नशीब आजमावणाऱ्या नवख्या उमेदवाराने आपल्या जाहिरनाम्यातून वर्धा जिल्ह्यातून दारूबंदी हटविण्यासाठी किंवा दारू खुली करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  मतदारांना वचन दिले आहे. त्यामुळे मतदार संघात या नवख्या उमेदवाराच्या जाहिरनाम्याचीच चर्चा आहे.
           आशिष इझनकर हे वर्धा लोकसभा मतदार संघातून विदर्भ मंच कडून उभे आहेत. इतर पक्षाप्रमाणे आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी मतदारांनी त्यांना निवडून दिल्यास वर्धा जिल्हा दारूमुक्त करण्याचे वचन दिले आहे. आपले मत मांडताना त्यांनी अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने मांडले आहे.
एकाच मतदार संघात दोन नियम कसे ?  – आपला पक्ष ठेवतांना त्यांनी म्हटले आहे की  वर्धा मतदार संघात अमरावती जिल्ह्याचा काही तर काही वर्धा जिल्ह्याचा भाग येतो. शासकीय नियमानुसार अमरावती जिल्यात दारू खुली आहे तर वर्धा जिल्ह्यात दारू बंदी आहे. त्यामुळे एकाच मतदार संघात सोन नियम कसे असा प्रश्न केला आहे.
शासनाचे महसूल वाढणार – आपला मुद्दा लोकांना पटवून देतांना ते सांगतात की वर्धा जिल्ह्यात दारू बंदी असतांना देखील येथे दारू  मिळते. काळाबाजार करणारे लोक नकली किंवा मध्यप्रदेश मधून दारू आणून ती विकतात. तसेच शहरात आणि परिसरात गावठी दारू देखील तयार केली जाते. त्यात वापरण्यात येणारे साहित्य हे विषारी असल्याने जनतेच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम पडत आहे. तसेच शासनाचा महसूल सुद्धा बुडत आहे.
नवख्या उमेदवाराचे प्रस्थापितांना तगडे आव्हान – विदर्भ मंच कडून कात्री (कैची) या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आशिष इझनकर यांच्या जाहिरनाम्यातील अनेक मुद्दे मतदारांना आकर्षित करत आहेत. वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या पक्षाना विदर्भाचा विसर पडला आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या जाहिरनाम्या मुळे इझनकर यांनी प्रस्थापितां समोर तगडे आव्हान उभे केले आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close