आनंद बारबुद्धे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
मोर्शी :-/ ओंकार काळे
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे वतीने येथील युवा शेतकरी आनंद गजाननराव बारबुध्ये यांना श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मोर्शीतील प्रगत शेतकरी, येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे आधारस्तंभ गजाननराव बारबुध्ये यांचे चिरंजीव, नेदारलँड येथून शेतीविषयक उच्च शिक्षण प्राप्त करून सुद्धा आपल्या मायभूमीची सेवा करण्याचे ध्येय ठेऊन गेल्या ४-५ वर्षात शेतीउत्पादनात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल कृषी विभागाने काल दि. 00-00 रोजी मुंबई येथील आयोजित सत्कार व पुरस्कार वितरण समारंभात राज्याचे महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्या यशामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या आपल्या मातोश्री सौं. पदमाताई यांचे समवेत आनंदने पुरस्कार स्वीकारला. आनंदला मिळालेल्या या पुरस्काराने मोर्शीकरांची मान अभिमानाने उंचावली असून सर्व स्तरातून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सन्मानाबाबत मोर्शी पत्रकार संघ, शिवाजी बहुउद्देशीय संस्था, विश्व् हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी संघटनाकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.