अन्न धान्य, वस्त्र, आर्थिक निवाऱ्याचे भरीव दान धर्म करून जिवण सफल करा – मुफ्ती इम्रान साहब
रमाजान पुर्व तयारी
सोयगाव तालुका प्रतिनिधी
———————————
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वास शुक्रवार (ता. १० मार्च ) पासून प्रारंभ होवू शकतो. इस्लाम धर्मात पवित्र ‘रमजान’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अल्लाहची विशेष इबादत (उपासना) केली जाते. मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे (उपवास) पाळले जातात.
रोजाबरोबरच नमाज, कुराण पठण, विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते. मुस्लिम धर्मामध्ये चांगल्या व्यक्तीला उत्तमरीत्या परिभाषित करण्यात आले आहे. यासाठी मुस्लिम असणेच पुरेसे नाही तर मुलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पहिले इमान (प्रामाणिकपणा) दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात. इस्लाममध्ये सांगण्यात आलेले हे पाच कर्तव्य इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीकडून प्रेम, सहानुभूती, मदत आणि आपलेपणाची इच्छा बाळगाव्यात -मुफ्ती इम्रान साहब यांनी उपस्थितांना उद्देशुन सांगितले.
सोयगाव नगर पंचायत परिसरातील सिद्दीकी मस्जिद येथे (ता.६) बुधवारी कार्यक्रमात मुफ्ती इम्रान साहब यांचे अध्यक्षतेखाली नेकी फाउंडेशन सोयगाव यांच्या तर्फे घेण्यात आला. यात पुढील होवू घातलेल्या पवित्र रमान महीण्यात
अन्न – धान्य, वस्त्र, आर्थिक मदतसह निवाऱ्याचे भरीव दान धर्म करून गोर गरीब, गरजवंतांना शक्य असेल त्या प्रमाणात दान धर्म करून पुण्य प्राप्त करावे असे आवाहन करण्यात आले.
सोयगाव येथे २० वर्षांपासून रूजू असलेले इमामत करणारे इमाम शेख अहेमद मुल्लाजी , प्रगती शाळेंत निःस्वार्थ विस वर्षापासुन सेवा देणारे शिक्षक अब्दुल गफ्फार अब्दुर रशीद आणि जिल्हा परिषद उर्दू शाळेत सात वर्ष सेवा देणारे शिक्षक शेख नासीर अहेमद मुस्तुफा , समाकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात नेकी फाउंडेशनचे अध्यक्ष गुलाम रसूल , उपअध्यक्ष वसीम शेख, फाउंडेशन चे संचालक सईद देशमुख, नसीर मनयार, जमील पटेल , शेख सुलतानत , इम्रान देशमुख , जमील शेख , गायस शेख, जुनेद देशमुख, उमेर देशमुख, अनिस मौलाना, जाकीर शेख, अमान शेख शोहेब देशमुख , वसीम पटवेकर, सैफ मौलाना व सर्व सदस्य उपस्तित होते.
रोजाचा मूळ उद्देश सागतांना – मुफ्ती इम्रान साहब म्हनाले की, रमजानमध्ये रोजा या शब्दाला आरबी भाषेत सोम म्हणतात, याचा अर्थ थांबणे. रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व दिवस ‘रोजा’ (उपवास) करणारे सर्व ‘रोजेदार’ दिवसभर अन्नपाणी घेत नाहीत. यासाठी शारीरिक आणि मानसिक संयमाची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आणि मनाला एक शुचिभरूत वळण लाभतं. मन एकाग्र करायला सुद्धा याचा फार उपयोग होतो. त्याचप्रमाणे ‘ इबादत’ (उपासना) करण्यासाठीसुद्धा योग्य पार्श्वभूमी व मानसिकता निर्माण होते. संपूर्ण रमजान महिना हा जणू उपासनामय, प्रार्थनामय आणि भक्तिमय होत असतो.
‘रमजान’ मांगल्याचे प्रतिक आहे. त्यामुळे याला कृपाप्रसादाचा महिनाही म्हणतात. पवित्र कुराणाचे अवतरण याच महिन्यातील एका रात्री झाल्याने ही रात्र हजार रात्रींपेक्षा वरचढ ठरली आहे. रमजातमध्ये रोजे अनिवार्य आहेत. या रात्रीत जादा नमाज अदा करणे म्हणजे अल्लाहच्या समीप जाणे होय. नफील नमाजचा (जादा नमाज) मोबदला फर्ज (अनिवार्य नमाज) इतका दिला जातो तर फर्ज (अनिवार्य) नमाजचा मोबदला सत्तर पटीने जास्त असतो. असेही मुफ्ती इम्रान साहब यावेळी म्हणाले.