जिल्ह्यातील महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित- जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी
नगर परिषदेचा अभिनव उपक्रम
आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य प्रदर्शनी
भंडारा दि 9- महिलांनी न घाबरता, निर्भय होऊन विविध क्षेत्रात समोर जाने गरजेचे आहे त्याकरिता आवश्यकता पडल्यास पोलीस विभाग तत्पर राहील. स्पर्धेच्या युगात वावरत असतांना महिला व युवतींनी चांगल्या गोष्टींची स्पर्धा करावी. मात्र त्यापासून स्वतः ला किंवा दुसऱ्या इजा, मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांकडे दृष्ट नजरेने पाहणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी जेव्हा महिला, युवती स्वतः, बाजुला अन्याय अत्याचाराला बळी पडण्यापूर्वी पोलीस विभागाच्या ११२ हेल्पलाईनवर संपर्क केल्यास काही वेळातच पोलीस तेथे पोहचणार आणि महिला वर्ग सुरक्षित राहील. असे केल्यास जागतिक महिला दिन साजरा केल्याचे स्वार्थक होईल म्हणून जिल्ह्यातील महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित राहील असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी केले.
ते संताजी मंगल कार्यालयात आयोजित नगर परिषद भंडारा, महिला व बालकल्याण समिती व दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळाव्यात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर पालिका नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय प्रभारी उपाआयुक्त संघमित्रा ढोके होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, मार्ल्यापण करून व व्दीप प्रज्वलित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विनोद जाधव, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय नगर परिषद पालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त चंदन पाटील, उपमुख्याधिकारी अश्विनी चव्हाण, सौ. जाधव, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय कल्पना शिरपूरकर, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे, शहर स्तर संघ अध्यक्षा रंजना साखरकर, नगर परिषदेच्या समूह संघटिका रेखा आगलावे, उषा लांजेवार उपस्थित होत्या.
त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित तृणधान्या पासून तयार केलेले पाककला प्रदर्शनीचे उद्घाटन व अवलोकन करण्यात आले होते. त्यामध्ये महिला बचत गटांतर्गत तृणधान्य पदार्थ चे 18 स्टोल लावले असून त्यात भगरची खीर,ईडली,उत्तपम, राजगिरयाचे लाडू,हलवा, ज्वारीची चकली व आंबील, झुणका भाकर, भाकरीचा चुरमा, इडली, नाचणीचे ढोकळा,हलवा,सूप,केक व इतर पौष्टीक तृणधान्य चे पदार्थ चे स्टोल होते.
मान्यवरांचे स्वागत ढोल ताशा, लेझीम च्या गजरात व स्वागत गीत तसेच शाल श्रीफळ, स्मृती चिन्ह आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
महिलांची उत्क्रांती होण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन केल्यामुळे आज महिलांनी देशातील विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. हे केवळ सावित्रीबाईची पुण्याही आहे.भंडारा नगर परिषदचे अधिकारी अभिमानास पात्र आहे. कारण नगर परिषदेच्या विविध योजनेच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून महिलांची मोठी फळी तयार केली आहे .तसेच भारतातील सर्व थोर महिलांच्या वेशभूषात महिला दिसत आहेत त्यातच महिलांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. म्हणून महिलांनी सावित्रीबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या नावाबरोबरच जिल्ह्याचे नाव लौकिक करावे. असे प्रतिपादन नगर पालिका नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय प्रभारी उपाआयुक्त संघमित्रा ढोके यांनी केले. तसेच महिलांनी विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावले आहे. आणि त्याकरिता आपल्या जिल्ह्याची महाराष्ट्रात ओळख कशी निर्माण करता येईल याकरिता सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मार्गदर्शन नगर परिषद परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रिडा क्षेत्रात उतुंग भरारी, गुणवंत विद्यार्थिनी, प्रशासकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार तसेच स्त्रीशक्तीचा गजर, जागर, अभिव्यक्ती व मार्गदर्शन तसेच महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्यांनी फॅशन शो मध्ये भारतातील थोर महिंला समाज सुधारक यांचे हुबेहूब वेश भूषा धारण करून त्यांचे जीवन चरित्र कार्यावर प्रकाश टाकला त्यामध्ये सावित्रीबाई, मा जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मिबाइ, सिंधीताई सपकाळ, मदर टेरेषा, माता रमाई इंदिरा गांधी, किरण बेदी, पी.टी,उषा,कल्पना चावला, अहिल्याबाई होळकर, आनंदी बाई जोशी, यांचे पात्र साकार केले. होम मिनिस्टर, रेड मॅचिंग, रांगोळी स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात व्यक्तिगत, समुह नृत्यांच्या माध्यमातून रसिकांचे मने जिंकली. सत्कार मृर्तीयांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी अमृततुल्य मार्गदर्शनाचे बाळकडू पाजले असुन कोटी कोटी अमृताचे दोन थेंब महिलांना मिळत राहो अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या. या दरम्यान आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असून त्यात थाईराइड, हिमोग्लोबिन शुगर, बिपी इ तपासणी करण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली नागुलवार यांनी केले व प्रास्ताविक नगर परिषदेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या नियमानुसार वस्ती पातळीवर बचत गटांचे व्यापक जाळे तयार झाले असून बचत गटांच्या वस्ती स्तर संघटना व शहर स्तर संघटना तयार करून शासकीय योजना व अर्थसहाय्य चे माध्यमातून महिलांचा स्तर उंचावणे व समाजात महिलांना आत्मनिर्भर करून गरूड झेप घेण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले जाते व विविध योजनेतून अर्थ सहाय्य उपलब्ध होत असल्याचे सांगितले. तर उपस्थितांचे आभार नंदा कावळे मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रकाश बांते, गुरुदास शेंडे, विलास रामटेक लिपिका गणवीर,शहर स्तर संघाचे पदाधिकारी समिता भंडारी, साहिना खान, प्रियंका सेलोकर, सीमा साखरकर, सुनंदा कुंभलकर, रंजना गौरी, नुतन कुरंजेकर, ज्योती राऊत, बेबी वाडीभस्मे, राजश्री गोस्वामी, सूर्यकांता वाडीभस्मे, कोमल बारापात्रे, सुनिता बावनकर, माधुरी खोब्रागडे, सारिका रामटेके, गीता नागपुरे, मुक्ता बोरकर, कोमल सोनटक्के, अंकिता साखरकर, भावना बोरकर,सुरेखा शेंडे भावना शेंडे, दक्षता लांजेवार, कुंदा बोरकर, व शहरातील बचत गटातील सर्व महिलांनी सहकार्य केले.