धबधब्याखाली लुटत होते आंघोळीचा आनंद इतक्यात घडले अघटीत
देहरादून (उत्तराखंड) / नवप्रहार ब्युरो
मृत्यू कधी कसा येईल याचा काहीच नसतो. तुम्ही हसत खेळत असताना देखील मृत्यू तुम्हाला गाठू शकतो. आता आम्ही तुम्हाला ज्या घटनेबद्दल सांगणार आहोत , ती वाचून तुमचा देखील या गोष्टीवर विश्वास बसेल. चला तर मग पाहू या नेमकी काय घडली घटना.
मी महिन्याच्या शेवटी शेवटी उन्हाने जनता कासावीस झाली होती. अश्यावेळी नागरिक थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात. अशा वेळेस त्या ठिकाणी धबधबा असेल तर मग धबधब्यात आंघोळ करण्याचा मोह आवरता येत नाही. पण अनेक वेळा अशा ठिकाणी पाय घसरून किंवा अन्य कारणाने अपघात घडतात. आणि लोकं जीव गमावतात.
उत्तराखंड च्या देहरादून येथून अशीच एक घटना समोर आली आहे. एका धबधब्यात वरून झाड कोसळल्यानं दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यात असलेल्या टायगर फॉल धबधब्यात ही दुर्घटना घडल
पोलिसांनी सांगितले की, धबधब्यात झाड वरून खाली कोसळलं. काही झाड्यांच्या फा्ंद्याही मधे अडकल्या आहेत. या कधीही खाली पडून आणखी दुर्घटना घडू शकतात. अडकलेल्या फांद्या हटवल्या जातील. गेल्या काही दिवसात परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडांची मुळं कमकुवत झाली आहेत. त्यामुळे झाड पडलं असावं.
टायगर फॉलजवळ घडलेल्या या घटनेनंतर आता पोलिसांनी सांगितलं की, गरज पडल्यास वनविभागाला पत्र लिहून त्यांची मदत घेतली जाईल. अजून तरी या भागात पर्यटकांना बंदी घातलेली नाही. पण सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सध्या धबधब्यात जाण्यास आणि तिथं अंघोळ करण्यास बंदी घालण्यात आलीय. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास काही दिवसांचा कालावधी लागू शकतो असं प्रशासनाने सांगितलंय.
टॉगर फॉलमध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलीय. पर्वतावरून झाड पडल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. यात दिल्लीतील अलका आनंद यांचा समावेश आहे. अलका आनंद त्यांची मुलगी आणि जावयासोबत फिरायला गेल्या होत्या. तर गीतराम जोशी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत धबधब्यात गेले होते.
पोलिसांनी सांगितले की, या ठिकाणी शाळेची सहल आली होती. त्यावेळी जवळपास ८० विद्यार्थी धबधब्याखाली होते. पण दुर्घटनेच्या आधी काही मिनिटं सगळे विद्यार्थी निघून गेले होते. दुर्घटनेवेळी घटनास्थळी २० ते २५ जण होते.