मुर्तिजापूर च्या जिगीषा महिला मंचाचा , आगळा-वेगळा उपक्रम!वडाचे रोपटे लावून केली वटपौर्णिमा साजरी,
नव प्रहार : – अनिल डाहेलकर
जिगीषा महिला मंच, मूर्तिजापूर ही संस्था महिला विकासासाठी कार्यरत असते , नेहमीच विकासाभिमुख व आगळे-वेगळे उपक्रम राबविण्यासाठी कायम अग्रेसर असते.नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेला संस्थेने,वडाचे रोपटे लावून धार्मिक महत्वासोबतच पर्यावरण जपवणूकीचा महत्वाचा संदेश दिला.मानवाच्या अव्यहार्य हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.हे संतुलन राखण्यासाठी अधिकाधीक झाडे लावून, त्यांचे संगोपण करणे महत्वाचे आहे.ही बाब लक्षात घेऊन,वरील उपक्रम घेण्यात आला.
श्री.महारुद्र काळामारोती संस्थान, श्रद्धानगर,भेलोंडे लेआऊटमधील जागेत, हे वडाचे रोपटे लावून,त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.या कार्यासाठी,निलेश उंबरकर सर,तृप्ती उंबरकर,मीना जवादे,रवींद्र जवादे,प्रा.वर्षा कावरे,वैशाली मोरे तसेच शिला गुडे, सरला तायडे व माही उंबरकर यांचेही सहकार्य लाभले.
भविष्यातही संस्था असेच, समाजपयोगी उपक्रम राबवेल,असा निर्मळ आशावाद, उपस्थित महिलांनी व्यक्त केला.सृजन साहित्य संघ, शब्ददीप बहु.प्रतिष्ठान व कांता फाउंडेशन या संस्थांचेही यावेळी सहकार्य लाभले.