भ्रष्ट्राचार

सरपंच यांनी गैरकायदेशीर कृत्य केल्याने त्यांना अपात्र करा आणि सचिवाची खाते चौकशी करा – मागणी 

Spread the love
पारवा / नारायण गटलेवार
                    सावरगाव ग्रा.पं. च्या सरपंच यांनी चुकीचा फेरफार घेऊन 8 अ तयार केल्याने त्यांना अपात्र घोषित करून सचिवाची खाते चौकशी करण्याची मागणी युसुफखा कासमखा पठाण यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि शासन दरबारी केली आहे.
             तक्रार कर्त्यांनी केलेल्या तक्रारी नुसार   शासन निर्णय क्रं. / जीपऊ/2018/प्र.क्र. 54/ वित्त 3/ तारीख 25 जून 2018 नूसार गावातील दिव्यांग व्यक्तीवर उत्पन्नाच्या 5 टक्के निधी खर्च करणे बंधनकारक आहे. परंतू सरपंच आणि सचिव यांनी दि. 18/02/2021 पासून एक रुपयाची खर्च केलेला नाही. पर्यायाने दिव्यांग व्यक्तीवर जाणीवपूर्व अन्याय केलेला आहे. शासन परिपत्रकानूसार मागासवर्गीयाच्या उन्नतीसाठी 15 टक्के खर्च करणे बंधनकारक असतांना सूध्दा सदर बाबीवर खर्च न करता मनमानी पध्दतीने खर्च केलेला आहे.
तसेच पंधराव्या वित्त आयोगामधून शासनाच्या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस या पोर्टलवरुन ई टेंडर न करता संपूर्ण टेंडर मॅनेज करुन कामकाज साहित्य खरेदी केलेली आहे. यामध्ये सरपंच व सचिव यांनी लाखो रुपयाचा अपहार केलेला आहे. तसेच पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व पाणी पुरवठ्याच्या कामात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार सरपंच सौ. सविता दशरथ मोहुर्ले व सचिव सौ. सुलोचना
गजाम यांनी केला असून त्यांचे भादंवि कलम 420, 406, 409, 468, 469, 471 अंतर्गत तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. 4) शासनाचे उत्पन्न वाढवण्याच्या धोरणानुसार दर चार वर्षानी फेर कर आकारणी करणे आवश्यक असतांना जाणीवपूर्वक आकारणी केलेली नाही.
        महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 124 नुसार वसूली करण्यासाठी सर्वप्रथम मागणी बिल बजावणी बंधनकारक असतांना मागणी बिल बजावण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत ची वसूली झाली नाही.  तसेच महिलांच्या कल्याणाकरीता एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के निधी खर्च करणे बंधनकारक आहे परंतू महिलांचा बाबीवर खर्च न करता कागदोपत्री दाखवनू रक्कमेचा अपहार केलेला आहे.
 सावरगांव ग्रामपंचायत मध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत असून मासिक सभा, ग्रामसभेची माहिती सभेत देण्यात येत नाही. मौजा सावरगांव येथे जल जिवन मिशन अंतर्गत पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून सदरचे कामे जे.सी.बी. ने करण्यात आलेली आहे. काम पूर्ण झाले असले तरी फोडलेल्या सिमेंट काँक्रीट रोडची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या संदर्भात सरपंच व सचिव यांना तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांना लेखी तक्रार देवून सुध्दा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
 विशेष म्हणजे सावरगांव ग्रामपचीचतचे सरपंच व सचिव हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभाराने ग्रामपंचायत चालवित आहे. विशेष म्हणजे आमचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यासोबत चांगले संबंध असल्याने आमचे कोणीही काहीही करु शकत नाही अशी धमकी सरपंच व सचिव ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना धमकी देत असतात.
 15 वित्त आयोगातून सन 2021 पासून ते आज पर्यंत आराखडयानूसार कोण कोणती कामे केली. किती निधी प्राप्त झाला व किती खर्च झाला याचा हिशोब सुध्दा सावरगांव ग्रामपंचायतीने आज पर्यंत दिलेला नाही.
           घरकूल देतांना प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आणि शबरी या गरीब व पात्र कुटूंबाला घरकूला ने देता मर्जीतील व्यक्तींना पैसे घेवून घरकूल दिलेले आहे.  पक्के घराचे जिओ टॅगिंग होत नाही. सदरचे घरकूल अपात्र होते. तरीही आर. एच. इ. यांनी जिओ टॅगिंग कसे केले. या प्रकरणी पंचायत समितीचे घरकूल विभाग प्रमुख आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, घाटंजी हे सुध्दा जबाबदार व दोषी आहेत.
 जाणीव पूर्वक पैसे घेवून चुकीच्या लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या घरकूलाची रक्कम संबंधीत यंत्रणेकडून वसूल करुन शासनाच्या खात्यात जमा करावी. तसेच घरकूलाचा लाभ देण्याबाबत चा नियमावलीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचाय अधिनियम 1959 चे कलम 39 (1) नूसार सरपंच सविता दशरथ मोहुर्ले यांना अपात्र करण्यात यावे आणि तेवढेच जबाबदार असलेले ग्रामपंचायत सचिव सौ. सुलोचना गजाम यांची विभागीय खाते चौकशी करुन शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावे, अशी मागणी शासन आणि प्रशासन दरबारी करण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close