आर्वी – माहूर बस सुरू करम्याची भाविकांची प्रचंड मागणी

देविच्या भक्ताचा होतो हिरमोड
आर्वी / प्रतिनिधी
आर्विच्या आगाराला आर्वीचे विद्यमान आमदार श्री दादाराव केचे साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे 10हिरकणी नवीन कोऱ्या कोऱ्या गाड्या मिळणार असल्याने भाविकामध्ये व प्रवाशामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत… त्यामुळे आता
साडेतीन शक्ती पीठापैकी एक प्रसिद्ध असलेले धार्मिक स्थळ माहुर येथील रेणुका मातेचे मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रात भक्ताचे प्रेरणास्थान असुन, देविच्या दर्शनासाठी भक्तांचा जीव कासावीस होत असतो.
परंतु आर्वी च्या एसटी महामंडळाने गेल्या एक वर्षापासून आर्वी-माहुर ही बस अचानक बंद केल्याने देविच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांचा हिरमोड केला. परिणामी अनेक प्रवाशामध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत.
आर्वी लगतच्या आष्टी, तळेगाव, जळगाव, रोहणा,शिरपूर, मांडला विरूळ,नांदपूर,टाकरखेडा,वर्धमनेरी,खुबगाव,देऊरवाडा परिसरातील अनेक भाविक देविच्या दर्शनासाठी आर्वी- माहुर बसने माहुरला नित्यक्रमाणे जावुन रेणुका मातेच्या चरणावर आपला माथा टेकून आपल्या मनातील मनोकामना पुर्ण करण्यासाठी वटी भरत असे. आर्वी लगतच्या परिसरातील अनेक भाविक माहुरला जाण्यासाठी नेहमी आसुसलेले असतांना आर्वी च्या एसटी महामंडळाने आर्वी च्या डेपो मध्ये बसचा तुटवडा असल्याचे मोघम कारण सांगुन आर्वी-माहुर बस बंद केल्याने आर्वी तिल प्रवाशी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहेत, ही बस बंद करण्याऐवजी आर्वी-लातूर ही बस बंद केली असती तर प्रवाशांना काहिही फरक पडला नसता,परंतु आपल्या मर्जिप्रमाणे निर्णय घेऊन भाविकांच्या पदरी निराशा आणणाऱ्या, आर्वी च्या बस स्थानक प्रमुखांनी आर्वी-माहुर बस त्वरित सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी जोर धरू लागली आहेत, जर ही गाडी नवरात्रीच्या आधी सुरू करण्यात आली नाही तर प्रवाशी मित्र मंडळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घेराव करून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. यासंदर्भात आर्वी प्रवाशी संघटनेचे काही पदाधिकारी आर्वी चे आमदार दादारावजी केचे यांना निवेदन देऊन आर्वी -माहुर ही बहुचर्चित बसगाडी सुरू करण्यासाठी मागणी करणार आहेत.तसेच आर्वी-शेगाव ही गाडी सुध्दा बंद आहेत, तेव्हा ती सुद्धा तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली..नवरात्र सुरू झाले तरीही हि गाडी सुरू न करण्यात आल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहेत. स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहेत
मी आर्वी माहुर गाडीने वर्षातून सात-आठ वेळा माहुरला दर्शनासाठी नित्यक्रमाणे जात असतो. परंतु आता आर्वी च्या डेपोने ही गाडी बंद केल्याने आम्हाला माहुरला जाण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे आर्वी-माहुर ही गाडी नवरात्र उत्सवाच्याकाळात ही गाडी सुरु करून आर्वी च्या भक्तांना गोड बातमी द्यावी, अशी आमची मागणी आहेत.कारण आता बसडेपोला नवीन हिरकणी गाड्या मिळाल्याने धार्मिक स्थळांना भेटीसाठी माहुर,शेगाव या गाड्या आवश्यक आहेत..
अविनाश ल..टाके
रेणुका मातेचे अस्सिम भक्त आर्वी
माहुर म्हणजे आमच्या कुटुंबाचे श्रध्दा स्थान असुन देविच्या दर्शनासाठी आमचा जीव कासावीस होतो, परंतु आर्वी च्या डेपोने आर्वी- माहुर ही सकाळी आठ वाजता सुटणारी गाडी अचानक बंद केल्याने आम्हाला माहुरला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो, त्यामुळे आमच्या खिशाला प्रचंड आर्थिक भूर्दड पडत आहेत. तेव्हा आर्वी च्या लोकप्रतिनिधी व नागरिकांनी माहुर गाडी सुरु करण्यासाठी मोठा पुढाकार घेऊन माता रेणुकामाता देविच्या भक्तांना न्याय मिळवून द्यावा, अशी आमची प्राजंळ इच्छा आहेत.
*योगेश* *त्रिवेदी*
रेणुका देविचे अस्सिम भक्त
आर्वी
आर्वी माहुर ही गाडी बंद करण्याचे कारण की,आर्वीच्या बस डेपोमध्ये बसचा तुटवडा असल्यामुळे अद्यापही माहुर बसगाडी सुरू केली नाहीत. तसेच यवतमाळ नंतर या गाडीला माहुर कडे जाणारे प्रवाशी सदर गाडीला मिळत नसल्याने आम्हाला नाईलाजास्तव ही गाडी बंद करावी लागली. परंतु आता आर्वीला आमदार दादाराव केचे यांच्या अथक प्रयत्नामुळे 10नवीन हिरकणी गाड्या उपलब्ध झाल्यानेहि माहुर, शेगाव व रामटेक गाड्या आम्ही पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करु,त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.थोड्याच दिवसांत माहुर, शेगाव, गाड्या आम्ही सुरू करणार आहोत..
डेपो मँनेजर
आर्वी