माजी विद्यार्थ्यांचे रंगले स्नेहमिलन आणि गुरुजनांचा सत्कार समारंभ..
अंजनगाव सुर्जी / प्रतिनिधी
. सातेगाव,तालुका अंजनगाव सूर्जी,जिल्हा अमरावती येथे सर्वांच्या आयुष्यातील सदैव स्मरणात राहील असाच एक दिवस. आपले बालपण आज प्रत्येकाने आपल्या तेव्हाच्या शिक्षकांच्या सोबत संपूर्ण दिवसभर अनुभवले.त्यातील कडूगोड आठवणींनी दिवसभर सतत मन भरून येतं होतं..चांगले वाईट सर्व च दिवस डोळ्यासमोरून गेले. हाफ पॅन्ट वर काढलेले दिवस,कठीण परिस्थितीत ही स्वतःला आणि कुटुंबाला सावरताना त्या तेव्हाच्या इवल्याश्या बाल मनाची झालेली केविलवाणी कसरत.आनंद सारखा बूट नाहीच घेता आला १० वी पर्यंत. आशुसारखं हुशार पण होता नाही आलं आणि संजुसारखा खोडसाळ पणा सुध्धा नाहीच करता आला.पण आज २५ वर्षानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची अनपेक्षित भेट ही सर्वांसाठी एक वेगळी अनुभूती ठरली.
आजचा दिवस सगळ्यांसाठी अत्यंत संस्मरणीय असाच होता.सर्वांच्या कुटुंबासोबत, मुलाबळांसोबत सर्व आलेत हीच ह्या कार्यक्रमाची आणि प्रेमाची पावती आहे ..त्यासाठी प्रत्येकाने घेतलेले कष्ट आणि त्याग ही तितकाच महत्वाचा आहे. आणि सगळ्यात अविस्मरणीय असा क्षण म्हणजे सांतेगांव च्या इतिहासातील आजच्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक क्षणाचे आपण असलेले साक्षीदार. कार्यक्रमाची सुरुवात झाली ती एका वेगळ्या भावनिक प्रसंगाने .शिक्षकच नव्हे तर बालवाडी शिक्षिकेपासून तर इतर कर्मचाऱ्यांचा ही सपत्नीक सन्मान झाला ही खरोखर आमच्या बॅच साठी अभिमानाची बाब ठरली.बालवाडीच्या भुयार मॅडम, वर्ग १ ते ४ च्या सर्वांच्या लाडक्या श्रीमती कडू मॅडम यांच्या पूजन व सत्काराने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.नंतर आमचे ५ ते १० चे सर्व शिक्षक शिक्षिका यांचा सहकुटुंब शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार झाला..सर्व शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे भारावलेले मनोगत ऐकून कित्येकांचे डोळे पाणावले होते.असा हा भावनिक प्रसंग हाताळताना प्रत्येकाची कसरत झाली.त्यानंतर सर्वांनी आपल्या शिक्षकांचे ऋण निर्देश करून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले.त्यानंतर सर्वांनी स्वरूची भोजनाचा आस्वाद घेतला.नंतर मैफिल रंगली ती माजी विद्यार्थ्यांच्या गप्पागोष्टी ची.पुन्हा त्या जुन्या आठवणी,टिंगलटवाळी आनंद देत होत्या.सर्वांना भेट वस्तू देऊन एक आठवणीत राहणारा क्षण सर्वांनी हृदयात जपून ठेवला.आज प्रत्येक जण चेहऱ्यावर हास्य घेऊन परतला .आपल्या मुळे आपले शिक्षक ,कर्मचारी सुध्धा उतारवयात थोडे का होईना आनंदी झाले हीच आपली खरी आमची आजची कमाई होती. शेवटी प्रत्येकाने एकमेकांना मिठी मारून साश्रू नयनांनी एकमेकांचा निरोप घेतला.तो पुन्हा पुढच्या भेटीची आशा मनात ठेऊन.अशाप्रकारे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन आणि चला वंदू गुरुराया.हा शिक्षकांचा सत्कार सोहळा अतिशय उत्साहपूर्ण कार्यक्रम आनंदाने पार पडला.१९९८ च्या बॅच चे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली..