वारकऱ्यांसाठी आता पेन्शन योजना
वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी आदेश जारी
• महामंडळाचे मुख्यालय पंढरपुरात
• ५० कोटी रुपयांचे भागभांडवल देणार
• वारकऱ्यांसाठी पवित्र असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास
• कीर्तनकार व वारकऱ्यांना वैद्यकीय मदत, विमा कवच
अकोला भाजप कडून महायुती सरकारचे स्वागत
अकोला
राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी व सुविधा पुरविण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. या महामंडळाबाबतचा आदेश रविवारी जारी करण्यात आला. या सरकारच्या निर्णयाचे व महायुतीचे नेते मुख्यमंत्री नामदार दे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अभिनंदन व आभार माजी खासदार संजय धोत्रे खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, किशोर पाटील जयंत मसने तेजराव थोरात, विजय अग्रवाल खापरकर महाराज, लोकेश तिवारी पद्माकर मोरे यांनी स्वागत केले आहे.
राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी यांनी केली होती. रविवारी या योजनेचा आदेश जारी करण्यात आला. या महामंडळामार्फत वारकरी, कीर्तनकार यांच्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व वारकऱ्यांची श्रद्धास्थान पंढरपूरला महत्त्व सरकारने दिले असून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील लाखो वारकरी चारवारी मोठ्या संख्येने महाराष्ट्र कर्नाटक देशभरातून भक्त येतात त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने घेऊन महायुती सरकार हे संस्कृती संवर्धन राष्ट्रनिर्माणात महत्त्वपूर्ण असल्याचे भाजप नेत्यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. या महामंडळाला ५० कोटींचे भागभांडवल देण्यात येणार आहे.
महामंडळाच्या महत्त्वाच्या प्रस्तावित योजना
• राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवणे.
• सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.
• आषाढी कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच देणे.
• वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्याकरिता (टाळ, मृदंग, विणा, इ.) अनुदान देणार
• कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबविणार
• आषाढी-कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देणार.
• पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्त्य ऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व गड इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास करणे.
• चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करणे.
• परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची कार्यवाही करणे.
• श्री क्षेत्र पंढरपूर येथील ६५ एकरमध्ये काँक्रिटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे, त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत. या जागेव्यतिरिक्त पालख्या, वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी, फडांसाठी तसेच त्यांच्या सोयी-सुविधांसाठी कार्यवाही करणे. साठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन वारकऱ्यांचा संस्कृती संवर्धनाचा व संत महात्म्यांचा हा महाराष्ट्र असल्याचा कृतीने सिद्ध केला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महामंडळ मंत्रिमंडळातल्या सर्व सहकार्यांचे स्वागत खासदार धोत्रे आमदार सावरकर आमदार खंडेलवाल आमदार पिंपळे आमदार भारसाकले, अगरवाल थोरात पाटील मसने खापरकर लोकेश तिवारी पद्माकर मोरे आदींनी केले,