शैक्षणिक

आर्वी च्या विद्यार्थ्यांचा पॉ लिटेकनिक आणि आयटीआय कडे कल

Spread the love

भविष्यात नौकरी लागणार म्हणून विद्यार्थ्यांचा, या शिक्षणाकडे वाढता ओढा
प्रतिनिधी…. आर्वी….

यंदा दहावी व बारावीच्या परिक्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांनच्या गुणांच्या टक्केवारीत प्रचंड वाढ
झाली, त्यामुळे आयटीआय व पाँलाटेकनिककडे पाठ फिरविणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता
अकरावी प्रवेशासाठी, आयटीआय, पाँलाटेकनिकलसाठी प्रचंड गर्दी
केली आहे. आयटीआय, पाँलाटेकनिकसाठी
विद्यार्थ्यांची रिघ लागली आहे.आर्वी येथील तंत्रनिकेतन मध्ये ३४० जागा उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांकरिता, विविध प्रकारच्या सहा शाखा आहेत, त्यात सिव्हिल इलेक्ट्रिकल, मँकेनिकल,इलेक्ट्रॉनिक, संगणक फँकेल्टीसाठी प्रत्येकी,६० तर केमिकल इंजिनिअरिंग करिता,४०जागा उपलब्ध आहेत.. आतापर्यंत ४००च्यावर विद्यार्थ्यांनी,प्रवेशासाठी आँनलाईन नोंदणी पोर्टलवर केली आहे.. तसेच आँनलाईन नोंदणीकरीता,आता ९जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना वाढीव मदत देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्रे जुळविण्याकरिता पुष्कळ अवधी मिळाला आहेत. अर्थातच गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रथम फेरीकरिता,विकल्प भरता येणार आहेत… त्यानंतर गुणवत्तेनुसार. विद्यार्थ्यांना विविध संस्था आणि शाखेचे गुणाकंनानुसार,वाटप करण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थी आपला प्रवेश मिळालेल्या शाखेत, संस्थेत जाऊन निश्चित करु शकतात.. या तंत्रज्ञान शिक्षणातून,भविष्यात हमखास कंपनी मध्ये रोजगार मिळेल, असे आशावादी चित्र निर्माण झाल्याने आर्वी च्या ग्रामीण परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचा ओढा तंत्रज्ञान शिकण्यासाठी वाढू लागला आहेत..
वस्तुतः . यावर्षी निकालात प्रचंड वाढ झाली आहे. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.. परिणामी
विद्यार्थ्यांच्या गुणाची टक्केवारी वाढल्याने आर्वीलगतच्या विद्यार्थ्यांमध्ये आवडीचा कोर्स मिळवण्यासाठी विविध अभ्यास क्रमात चुरस व चढाओढ निर्माण झाली आहे. अर्थातच निकालाअगोदरच आयटीआय, पाँलाटेक्निक,बीई प्रवेश प्रक्रिया मध्ये विद्यार्थ्यांचा ओढा असतानांच, आता जुलै महिन्यात टप्याटप्याने,प्रवेशप्रक्रिया सुरू होत असून वर्धा जिल्हात शासकीय, शासकीय अनुदानित, खासगी पाँलाटेकनिक काँलेज मध्ये जवळपास जवळपास एक हजारांहून अधिक प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत जवळपास हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आल्याने गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना शासकीय काँलेज
मिळणार आहे, तर कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना खाजगी
काँलेज मध्ये प्रवेश घ्यावे लागणार
असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कभी खुशी कभी गम असे वातावरण
निर्माण झाले, हेही तेवढेच खरे आहे.परंतु भविष्यात हमखास नौकरी लागण्याची हमी असल्याने जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी, आता आयटीआय, पाँलिटेकनिक, ,अभियांत्रिकी शिक्षणात रुची दाखविल्याने या क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली, हेहि तेवढेच खरे आहेत.

व्यावसायिक अभ्यास क्रमाने आमच्यात सर्जनशीलता निर्माण होते, त्यामुळे मी आयटीआय कडे
जाण्याचा संकल्प केला आहे. आपल्या व्यावसायिक क्षमतेने आपण स्वयनिर्भय होतो, म्हणून मी आयटीआय ची निवड केली आहे, भविष्यात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याने विद्यार्थ्यांनी स्वयनिर्भय व्यावसायिक अभ्यास क्रमाची निवड केल्यास भविष्यात स्वतः च्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळणार आहे.
*अनुप जैसिंगपुरे*
आर्वी

 

स्पर्धेत टिकायचे असेल तर कौशल्य धारित अभ्यास क्रमाची
निवड करणे आवश्यक आहे, त्या
दुष्टिने मी पाँलाटेकनिकल च्या
इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक कोर्सला
प्राधान्य देणार आहे, भविष्यात
व्यावसायिक अभ्यास क्रम जीवनात उपयोगी पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्पादन क्षम
अभ्यास क्रमाची निवड करावी.
अधिराज रमन *दलाल*
*आर्वी*

 

21व्या शतकात सर्वच क्षेत्रात पराकोटीची स्पर्धा असुन, शिक्षण क्षेत्र सुध्दा यात मागे नाहीत. भविष्यात आपल्याला स्वतः च्या पायावर उभे राहाता यावे म्हणून अनेक. विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण तंत्रज्ञान कौशल्य,आत्मसात करता यावे म्हणून कमी खर्चाच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष पुरवितात. त्यादृष्टीने आयटीआय, पाँलिटेकनिक मध्ये हमखास अँडमिशन मिळण्याची शक्यता राहत असल्याने विद्यार्थ्यांचा,व्यावसायभिमुख शिक्षणाकडे प्रामुख्याने ओढा वाढला आहेत, त्यामुळे या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिसुन येतो.
*अविनाश टाके
*शिक्षक आर्वी*
…………………………

 

शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेशाकरीता,९जुलै पर्यंत वरिष्ठांच्य सुचनेनुसार वाढवून दिला आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे तयार ठेवून वेळेपुर्वी प्रवेशाची तयारी करावी. आर्विच्या तंत्रनिकेतन मध्ये आमचा शिक्षक वर्ग दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आर्विच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अँडमिशन करण्यासाठी मोठी चुरस व स्पर्धा लागली आहेत.
डॉक्टर एम.ए.अली प्राचार्य
शासकीय तंत्रनिकेतन आर्वी जिल्हा….. वर्धा….
…………….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close