अखिल भारतीय बारी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन शेगावात उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वर्चुअल क्लिप द्वारे मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन
हजारो लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाले अधिवेशन
उपस्थित सर्व मान्यवरांनी समाजाच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन
आर्थिक विकास महामंडळ , राष्ट्रीय स्मारक, पान पिंपरी या वनौषधी पिकाला अनुदा नाची शासनाकडे मागणी
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
अखिल भारतीय बारी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन लाखो समाज बांधवांचे उपस्थितीत शेगावात रविवारी पार पडले.ह्या महाअधिवेशनाचे निमित्ताने अखिल भारतीय बारी समाजाच्या एकजूटीच दर्शन संतनगरी शेगावात घडले.असून सदर चे अधिवेशनाला संपूर्ण भारतातून, प्रत्येक गावातून हजारोच्या संख्येने स्वतःच्या वाहनांनी बारी समाजाचा जनसमुदाय लाखोच्या संख्येने शेगाव नगरीत अवतरला होता हा जनसमुदाय एक प्रकारचा न होतो न भविष्यतो असा ठरला
स्व गजाननदादा पाटील मार्केट मैदानावर झालेल्या अखिल भारतीय बारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार होते.तर मुख्य अतिथी म्हणून वंचित आघाडीचे अॅड बाळासाहेब आंबेडकर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,माजीमंत्री रामदास बोडखे,खा प्रतापराव जाधव, माजीमंत्री बच्चू कडू,आ डाॅ संजय कुटे,आ प्रविण दटके,आमदार. प्रकाश भारसाकळे,आ संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले,आ आकाश फुंडकर, माजी आ हर्षवर्धन सपकाळ, गजानन महाराज संस्थानचे ज्ञानेश्वरदादा पाटील,प्रसेनजीत पाटील,जयश्रीताई शेळके,डाॅ स्वातीताई वाकेकर,रामविजय बुरूंगले आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.
आपल्या प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप यांनी बारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ कसे आवश्यक आहे ते पटवून दिले.तर बारी समाजाची आजच्या परिस्थितीतील व्यथा, व समाजाचे मुख्य स्त्रोत असलेले पानपिंपरी हे वन औषधी पीक,पानमळे, या पिकाला कृषी विभागामार्फत मिळणारे अनुदान हे बंद पडले त्यामुळे संपूर्ण समाज हा कसा आर्थिक अडचणीत आला या पिकाचे,नैसर्गिक नुकसान झाल्यास शासनाने आर्थिक अनुदान द्यावे,अंजनगाव सुर्जी येथे संत रूपलाल महाराज स्मारक लवकर व्हावे,रूपलाल महाराजांना राष्ट्र संत दर्जा मिळावा,अशा मागण्या मान्यवरांचे समोर मांडल्यात.
कार्यक्रमा प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बारी समाजात बद्दलच्या रास्त असलेल्या मागण्या व काही प्रश्न याबाबत उपस्थित सर्व समाज बांधवांसमोर वर्चुअल क्लिप द्वारे एलईडी स्क्रीनवर उद्बोधन करून समाजाच्या असलेल्या सर्व मागण्या मी पूर्ण करून देण्याची ग्वाही देतो , व होणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनाला मी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे उपस्थित राहणार असे देवेंद्र फडणवीस यांनी वर्चुअल क्लिप द्वारे उपस्थित समाज बांधवांन समोर उद्बोधन केले
***************************
याप्रसंगी विनातारण बिनव्याजी कर्ज सुविधा द्यावी – अॅड बाळासाहेब आंबेडकर
* शासनाने आर्थिक विकास महामंडळापेक्षा विनव्याजी विनातारण कर्ज सुविधा देवून समाजातील गरजूंना ,बेरोजगारांना उद्योग ,व्यवसाय उभारणीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.यासाठी ठोस पाऊले उचलावी असे प्रतिपादन वंचित आघाडीचे अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
************************
* बारी समाजाच्या मागण्या शासन दरबारी मान्य करून घेण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकातील मुख्य लोकांनी समोर येऊन त्यासाठी शासन स्तरावर एक बैठक बोलावून त्यामध्ये चर्चा करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन समाजातील सर्वसमावेशक शिष्टमंडळ घेऊन मुंबई यावे मी स्वतः मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांचेसोबत चर्चेत हजर राहून पुढाकार घेईन.यासाठी त्यांनी शिष्टमंडळाचे नियोजन करण्याचेही बारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुचित केले
**************************
* अंजनगाव सुर्जी येथे संत रूपलाल महाराज स्मारक उभारणीसाठी जागा निश्चित करून भुमिपूजन करण्यासाठी स्वतः मूख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार उपस्थित राहतील,सोबतच समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणेसाठी तसेच वनौषधी पीक पान पिपरी ,पानमळे,ह्या पिकाला अनुदान मिळाले पाहिजे यासाठी शासनाकडून तरतूद करून घेवू,वेलवर्गीय असले तरी अनुदान मिळणेबाबत शासनाकडून मंजूरात मिळवून घेण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचेही माजी मंत्री आ डॉ संजय कुटे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
**************************
* मी विरोधी पक्षनेता जरी असलो तरी बारी समाजाच्या मागण्यासाठी माझे पूर्णपणे समर्थन असून वेळप्रसंगी मागण्या मंजूरीसाठी बारी समाज बांधवांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेडीवार यांनी आपल्या भाषणात उद्गार काढले याप्रसंगी
एक बारी लाखात भारी, जय बारी, जय बारी आर्थिक विकास महामंडळ मिळालेच पाहिजे,बारी समाज एकजुटीचा विजय असो,बारी समाज जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.