विशेष

27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर पडला प्रशासनाच्या अनास्थेचा बळी

Spread the love
कार नाल्यात जाऊन पडली , वडील पाहत होते मुलाची धडपड
ग्रेटर नोएडा / विशेष प्रतिनिधी 
                 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर चा कार नाल्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  प्रशासनाच्या अनास्थेमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे. धुके देखील यासाठी कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे. जीवनासाठी हा तरुण 80मिनिटे संघर्ष करत होता. तो आपल्या मोबाईल चा टॉर्च लावून मदतीची याचना करत होता. घटनास्थळावर SDRF आणि NDRF  ची चमू पोहचून देखील त्याला वाचवता आले नाही. 

 ग्रेटर नोएडाच्या सेक्टर 150 मधील एटीएस ले ग्रँडिओस जवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक दुर्दैवी अपघात घडला. एका वेगानेर येणारी कार अनियंत्रित झालीआणि नाल्याची भिंत तोडून थेट पाण्याने भरलेल्या बेसमेंटमध्ये पडली. माहिती मिळताच, नॉलेज पार्क पोलिस स्टेशन, अग्निशमन विभाग, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे साडेचार तास चाललेल्या बचाव कार्यानंतर, तरुणाला 30 फूट खोल पाण्यातून बाहेर काढण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे

वडिलांनी मुलाला जीवनासाठी संघर्ष करताना पाहिले

मृत तरुणाची ओळख 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवराज मेहता अशी झाली आहे. तो सेक्टर 150 मधील टाटा युरेका पार्क सोसायटीचा रहिवासी होता. अपघातानंतर युवराजचे वडील राजकुमार मेहता घटनास्थळी पोहोचले. आपल्या मुलाला जीवनासाठी संघर्ष करताना पाहिले. घटनास्थळी बॅरिकेड्स आणि रिफ्लेक्टर नसल्याने नोएडा प्राधिकरणावर निष्काळजीपणाचा आरोप करत वडिलांनी नॉलेज पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

युवराज एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता

राजकुमार मेहता हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त संचालक आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांची मोठी मुलगी युनायटेड किंग्डममध्ये राहते. त्यांचा मुलगा युवराज गुरुग्राममधील सेक्टर 54 येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि तो वर्क फ्रॉम होम करत होता.

दाट धुक्यामुळे त्याची गाडी नाल्यात पडली

शुक्रवारी (16 जानेवारी) रात्री उशिरा युवराज गुरुग्रामहून त्याच्या कारने घरी परतत होता. दाट धुक्यामुळे, घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या सेक्टर 150 टी-पॉइंटवर त्याची कार नाल्याची भिंत फोडून पाण्याने भरलेल्या बेसमेंटमध्ये पडली.

युवराज कसाबसा कारमधून बाहेर पडला

पाण्याची पातळी अधिक असल्याने त्याची कार उलटली आणि ती पाण्यावर तरंगू लागली. युवराज कसाबसा कारमधून बाहेर पडला आणि त्याने त्याच्या वडिलांना अपघाताची माहिती देण्यासाठी फोन केला.

लहान-मोठ्या क्रेनने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला

मुलाचा फोन येताच घाबरलेले वडील तात्काळ 112 वर फोन करून घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच, कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी सर्वेश सिंह अग्निशमन दलासह पोहोचले. अग्निशमन केंद्रातून लहान-मोठ्या क्रेन बोलावून तरुणाला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही

.

मोबाईल टॉर्च लावून तो मदतीसाठी ओरडत होता

कारमधन बाहेर पडल्यावर युवराज कारच्या वर उभा राहिला. तो मोबाईलची टॉर्च फ्लॅशलाइट लावून “मदत करा!” असे ओरडू लागला. तब्बल 80 मिनिटं हो मदतीची याचना करत होता. अंधार आणि दाट धुक्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला. थंड पाण्यामुळे आणि बांधकाम सुरू असलेल्या कॉलमला धडकण्याच्या धोक्यामुळे, बचाव पथक पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू शकले नाही.

अडीच तासानंतर त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आलं

घटनास्थळी उपस्थित असलेले वडील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वारंवार मदतीसाठी याचना करत होते. रात्री उशिरा 1:45 वाजताच्या सुमारास युवराज त्याच्या गाडीसह खोल पाण्यात बुडाला. काही वेळातच एसडीआरएफची टीम आली, परंतु साधनांच्या कमतरतेमुळे ते युवराजपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यानंतर गाझियाबादहून एनडीआरएफची टीम आली आणि सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी त्या तरुणाला बाहेर काढले. मात्र, रुग्णालयात नेताच त्याला मृत घोषित करण्यात आले.

बचावकार्यात विलंब झाल्याचा आरोप

याप्रकरणी कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक रहिवाशांनी बचावकार्यात विलंब झाल्याचा आरोप केला आहे. तर, पोलिसांच्या मते, प्रथमदर्शनी हा अपघात वेग आणि धुक्यामुळे नियंत्रण गमावल्यामुळे झाला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close