शेती विषयक

नाल्याच्या प्रवाहाने रस्ता गेला वाहून. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान.

Spread the love

यवतमाळ –घाटंजी मार्गाचे दुपदरी रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक आमदार यांच्या निधीतून करण्यात आला लाखो रुपयाचा निधी खर्च करून हा रस्ता बनविण्यात आला त्यामुळे वाहतूक करणाऱ्यांची दुपदरी रस्त्यामुळे सोय झाली अपघाताचे प्रमाण सुद्धा त्यामुळे कमी होण्यास मदत झाली.मात्र या कामाच्या नियोजनात मोठा घोटाळा असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनात येत आहे.त्यामुळे पावसाच्या पाण्याने नाल्याच्या प्रवाहणे सडक वाहून गेली.
जिल्ह्यात झालेल्या मागील अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना नाल्यांना मोठा पूर आला या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले. एक-दोन दिवसाच्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक धरणे भरल्या गेली.नदी नाले उपनद्या ओसडून वाहू लागली.
यामध्ये शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे नदी नाले,उपनद्या, तसेच धरणे सुद्धा लवकर भरली गेली. धरणांचा गाळ उपसा न झाल्याने धरण एक ते दोन पावसामध्ये भरले गेले तोच प्रकार नदी नाल्यांचा सुद्धा झाला नदी नाल्यांची खोलीकरण सुद्धा करण्यात आली नसल्याने पाण्याचा प्रवाह शेतात शिरला गेला. त्यामुळे अनेकांची शेती खरडून गेली अनेकांच्या शेतीमधून मातीचा नामलेश राहिला नसून फक्त दगड आणि धोंडे शिल्लक राहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जीव जगण्याच्या मार्ग बंद झाला आहे.

या पावसाने घाटांजी मार्गावरील असलेल्या निळोणा धरणाने अक्षरशः पाण्याची मोठी पातळी गाठल्याने पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला होता.अनेक गावांना जोडणारा एकमेव मार्ग असल्याकारणाने प्रवाशांची कोंडी झाली. याच रस्त्याने वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह रस्त्याखाली असून या पावसाने तेथील दूपदरी असलेला रस्ता अक्षरशा खरडून नेला असून रस्त्यावरील डांबराची परत ही बाजूच्या शेतात वाहून गेली आहे. तसेच त्या शेताचे सुद्धा मोठे नुकसान झाले असून शेतीमधील संपूर्ण माती वाहून गेली आहे तेथे फक्त दगड धोंडे शिल्लक राहिले आहे. अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला असून दोन पदरी रस्त्याच्या मार्ग एक पदरी रस्ता झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अनेक लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मुख्य रस्त्याने अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही रस्त्याचे व त्या नाल्याचा प्रवाह मोठा करून यापुढे येणाऱ्या संकटाकरिता कायमस्वरूपी उपाय योजना आखून नागरिकांना व प्रवासी लोकांना दिलासा द्यावा.

सतत पावसाने नाल्यावरील रस्ता वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यवतमाळ घाटांजी,अकोला बाजार असे अनेक गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर होणे गरजेची आहे.

या रस्त्याच्या बांधकामांमध्ये बांधकाम विभागाने मोठा घोळ केल्या असल्याचे निदर्शनात येत असून या रस्त्यावरील नाल्याच्या वरील बाजूला सिमेंट कठड्याची निर्मिती केली नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या नाल्याचा प्रवाह वाहून जाण्याकरिता निमुळता पाईपांचा वापर केलेला दिसत आहे. सिमेंट पुलाची निर्मिती होणे अपेक्षित असताना सिमेंट पाईपचा वापर केला आहे. तसेच नाल्याचे खोलीकरण सुद्धा केले नसल्याने साधारण पावसातही पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे.
त्यामुळे बाजूला असलेल्या शेतीचे पीक हे वाहून जाऊन त्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close