सामाजिक

संजय गं. चौधरींचे ” गेले ते दिवस ” पुस्तकाचे प्रकाशन संपन्न!

Spread the love

 

अकोला  / नवप्रहार डेस्क

नुकतेच रविवार दि. 7 एप्रिल 2024 रोजी प्रशिध्द लेखक श्री संजय गं. चौधरी यांचे *गेले ते दिवस* या ललीत लेख संग्रहाचे प्रकाशनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या प्रकाशन सोहळ्याचे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पत्रकार , शिक्षण तज्ञ व प्रशिध्द स्तंभ लेखक प्रा. मोहन खडसे सर लाभले होते. तर महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त लेखक, श्री सुरेश पाचकवडे यांचे हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई चे सदस्य श्री पुष्पराजजी गावंडे सर यांनी भाष्यकाराची भुमिका पार पाडली.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष तुळशीराम बोबडे, विदर्भ साहित्य संघ अकोला चे सचिव डॉ. विनय दांदळे, अकोला येथील प्रसिध्द लेखक व पत्रकार चंद्रकांतजी झटाले सर लाभले होते.

प्रास्ताविक मध्ये पुस्तकाचे लेखक श्री संजय गं. चौधरी म्हणाले, ” गेल्या 30/40 वर्षामध्ये जगात खूप बदल झालेला आहे. मात्र नवीन पिढीला याची बिलकूल कल्पना नाही. नवीन पिढिला ह्या जुन्या गोष्टी माहीत पडाव्यात यासाठी मी ‘ गेले ते दिवस’ हे पुस्तक काढण्याचे ठरविले होते ; ज्याचे आज प्रकाशन होत आहे.

” गेले ते दिवस ” पुस्तकाचे प्रकाशन करतांना जेष्ठ साहित्यिक श्री सुरेश पाचकवडे म्हणालेत, ” भूतकाळाचे शाश्वतरूप दाखविणारे संजय गं. चौधरी यांचे हे ललित लेख जेष्ठ व्यक्तींना आपले लहानपणीची आठवण करून देण्यास सार्थ ठरतात.
या लेखामध्ये आपले बालपण सामावलेलं आहे याची प्रचिती हे लेख वाचतांना येते. पुन्हा हे दिवस आपले आयुष्यात येणार नाहीत याची खंतही वाटते. ”

श्री पुष्पराजजी गावंडे सर हे पुस्तकावर भाष्य करतांना म्हणालेत की, ” पुस्तकामध्ये लिहिले आहे, लेखक शिकलेले नाहीत ; मग त्यांनी हे पुस्तक लिहिले कसे?
म्हणजेच संजय चौधरी हे घरी का असेना पण शिकलेले आहेत . फक्त त्यांचेजवळ डिग्री नाही. ”

लेखक हे हार्डवेअर चे अर्थात टनक लोखंडी वस्तुचे दुकान चालवितात, मग त्यांचे साप्टवेअर म्हणजे मन एवढे संवेदनशील, लवचिक, नरमाईचे कसे याचे मला आश्चर्य वाटते. कारण लेखक म्हटला म्हणजे त्याचे मध्ये वरील सर्व गूण असणे आवश्यक असते. ”

शेवटी पुस्तकातील सर्वच लेख सुंदर असल्याचे ते म्हणालेत.

दरम्यान इतरही मान्यवरांचे यथोचित भाषणे झालीत.

शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रा. मोहन खडसे सर म्हणालेत, ” मी एका चांगल्या माणसाचे चांगल्या कार्यक्रमासाठी आलो, याचा मला अभिमान आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एकनाथ खेळकर सर यांनी तर आभार प्रदर्शन पुरी सर यांनी केले.

कार्यक्रमास बहुसंख्य साहित्य प्रेमी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close