सामाजिक

पोलिसांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने व्यक्तीने स्वतःला चौकी बाहेर पेटवून घेतले

Spread the love

पुणे / प्रतिनिधी

                अनेक घटनेत पोलिसां कडून तक्रारी नंतरही कारवाई करण्यास दिरंगाई करण्यात येते. अश्याावेळी पोलिसां कडून चौकशी करत असल्याचे कारण सांगितल्या जाते. पण ज्या व्यक्तीला त्रास असतो तो पोलिसांनी लवकर कारवाई करावी म्हणून आग्रही असतो. महत्वाचे असे की पोलीस विभाग घटनेपूर्वी क्वचित केसेस मध्ये पेअतिबंधात्मक कारवाई करतात.कधी कधी तर पोलीस तक्रार कर्त्यांना आधी तुम्ही एकमेकांचे डोके फोडा नंतर आम्ही तुमची तक्रार करतो असा उरफाटा सल्ला देखील देतात.त्यामुळे अन्यायग्रस्त व्यक्ती संतापतो. पोलिसांच्या दिरंगाईने संतापलेल्या  अश्याच एका व्यक्तीने स्वतःला पोलीस चौकीच्या बाहेर जाळून घेतल्याची घटना पुणे येथिल वाघोली परिसरात घडली आहे.व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या व्यक्तीचे वय 34 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्याने घटनेची माहिती दिली. वाघोली परिसरात मंगळवारी ही घटना घडली.

रोहिदास जाधव याने पोलीस चौकीच्या बाहेरच स्वत:ला पेटवून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आग विझवून जाधव यांना रुग्णालयात नेले. जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहिदास जाधव यांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतील पार्किंगच्या वादावरून अन्य एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती, ज्यात पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी उलट तक्रारही करण्यात आली होती.

“जाधव हे मंगळवारी सकाळी वाघोली परिसरातील पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी त्यांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. अदखलपात्र गुन्ह्यांतर्गत दाखल केलेल्या तक्रारीत अटक करण्याची तरतूद नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले,” असे अधिकाऱ्याने सांगितले. . अधिकाऱ्याने तसे सांगितले, मात्र जाधव यांना ही बाब समजत नव्हती. त्यानंतर जाधव यांनी बाहेर जाऊन स्वत:वर ज्वलनशील पदार्थ शिंपडून स्वत:ला पेटवून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close