हटके

20 वर्षांपूर्वी मेलेला व्यक्ती जिवंत सापडतो तेव्हा ….

Spread the love

वेश बदलून राहत होता,  बायको उचलत होती पेन्शन 

स्वतः ला मृत दाखवण्यासाठी त्याने दोन लोकांना जिवंत जाळले 

 सत्यता कळताच पोलीस ही चक्रावले

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

                त्याने ज्या व्यक्तीचां खून केला त्याचे आणि त्याच्या बायकोचे अनैतिक संबंध होते. आपले हे कृत्य लपविण्यासाठी त्याने स्वतः ला मृत घोषित करण्याचे ठरवले. यासाठी त्याने दोन लोकांना ट्रक मध्ये जिवंत जाळले. विशेष बाब म्हणजे या काळात त्याची बायको पेन्शन उचलत होती. पोलिसांना हा खुनी जिवंत असून तो वेश बदलून राहत असल्याचे कळले तेव्हा पोलिसही चक्रावले.

           या प्रकरणा बाबत अधिक माहिती अशी की , बलेश कुमार नामक व्यक्ती हा नेव्ही अधिकारी होता. त्याचे राजेश नावाच्या व्यक्तीच्या बायकोशी अनैतिक संबंध होते. राजेश हा त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने बालेश ने राजेश ची हत्या केली होती. या कृत्यातून वाचण्यासाठी त्याने वेगळी शक्कल लढवली. त्याने तो अपघातात मेला आहे हे दर्शवण्यासाठी त्याने दोन व्यक्तींना ट्रक मध्ये जाळून मारले. त्या दोघांपैकी ऐक मारणारा तो आहे  यावर लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्याने सर्व पुरावे त्याच्या बाजूने ठेवले.

त्यामुळे बलेश वर कोणाला संशय आला नाही. बालेश मेला असे समजून पोलिसांनी देखील राजेश क्या खुनाची केस बंद केली. आश्चर्याची बाब म्हणजे बलेष ची पत्नी या दरम्यान पती ची पेन्शन देखील उचलत होती. तिकडे बलेश नजफगड मध्ये अमन सिंग बनून राहत होता. आणि प्रॉपर्टी डीलिंग चे काम करत होता.

20 वर्षांनंतर म्हणजे काही दिवसांपूर्वी पोलिसांना बलेश कुमार जिवंत असल्याची माहिती मिळाली. तो 20 वर्षांपूर्वी मेला नाही हे कळल्यावर पोलीस चक्रावले. कारण ट्रकमध्ये त्याचा आणि दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. आता प्रश्न असा होता की, त्या वेळी ट्रकमध्ये जळून मेलेला नेमका कोण होता? पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि बलेश कुमार हा नजफगडमध्ये अमन सिंह बनून राहत असल्याची माहिती समोर आली. तो प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. पोलिसांनी तिथे जाऊन त्याला अटक केली.

स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव
अटकेनंतर बलेश कुमारने पोलिसांना सांगितलेली गोष्ट भयंकर होती. राजेशचा खून केल्यानंतर बलेशने स्वतःच्या बनावट मृत्यूची स्क्रिप्ट लिहिली. ही स्क्रिप्ट पूर्ण करण्यासाठी तो रक्तरंजित खेळ खेळला आणि त्यासाठी दोन जणांचा जीव घेतला. स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने ट्रकमधल्या दोघांना जाळून टाकलं, जेणेकरून पोलिसांना वाटेल की तो ट्रक चालवत होता आणि त्याचा जळून मृत्यू झाला आहे. सर्व पुरावेही त्याने अशा प्रकारे ठेवले, की बलेशचा मृत्यू झालाय यावर पोलिसांचा विश्वास बसला.

20 वर्षं पोलिसांपासून वाचत राहिला
नंतर बलेश कुमार अमन सिंह बनून सामान्य आयुष्य जगू लागला. इतकंच नाही तर या कामात त्याची पत्नीही त्याला मदत करते. तिला तिच्या पतीच्या बनावट मृत्यूबद्दल सर्व काही माहिती असूनही ती अनभिज्ञ असल्याचं दाखवते. ती 20 वर्षं सरकारकडून पेन्शनही घेत होती. कारण बलेश पूर्वी नौदलात होता. पती-पत्नी दोघांनीही 20 वर्षं हा खेळ चालू ठेवला; पण अखेर बिंग फुटलं आणि बलेशला अटक झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close