सामाजिक

खाजगी कंपन्यांच्या कर्जाचा फास ; शेतकऱ्याच्या तीन पिढ्यांचा सत्यानाश 

Spread the love

छत्रपती संभाजीनगर / नवप्रहार मीडिया 

          शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सफकार कितीही गोष्टी करत असले  आणि आश्वासनाची खैरात वाटत असले तरी निसर्गाच्या लहरी पणामुके शेतकरी नापिकीच्या कचाट्यात सापडल्याने अनेक प्रयत्नांनंतरही त्याची आर्थिक परिस्थिती काही सुधारत नाही.आणि कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच जातो. खाजगी कंपनी कडून कर्ज घेतलेल एका कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी मृत्यूला कावटाळल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजी नगर मध्ये उघड झाली आहे.

दीड लाखांच्या कर्जापायी एकाच घरातील तीन पिढ्यांच्या कर्त्या पुरुषांचे बळी गेले आहेत. दीड लाखांचे कर्ज गेल्या १५ वर्षातही फेडता येत नसल्याचे दाहक वास्तव समोर आल्याने समाजमन सुन्न झालं आहे.

१५ वर्षांपूर्वी आजोबांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने सोमनाथ भोसले या ३० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे याच कर्जासाठी सोमनाथच्या वडिलांनी व मोठ्या भावानेही आत्महत्या केली होती. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सोमनाथवर येऊन पडलेली होती. कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याची परतफेड कशी करावी या चिंतेने गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. याच विवंचनेतून सोमनाथ पंडित भोसले याने घराजवळील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. खाजगी फायनान्स कंपनीकडून सोमनाथच्या आजोबांनी कर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड होत नसल्याने भोसले कुटुंबातील तिघांना आत्महत्या करावी लागली आहे.

या कर्जापायी २००८ मध्ये वडील पंडित भोसले तर २०१९ मध्ये मोठा भाऊ गजानन भोसले यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता घरातील कर्त्या सवरत्या सोमनाथनेही याच कर्जापायी आपलं जीवन संपवलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close