शेती विषयक
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबाग आणि शेतीचे प्रचंड नुकसान
माजी आ. अमर काळे यांची नुकसानग्रस्त भागाला भेट
आर्वी / नवप्रहार मिडिया
गुरुवारच्या मध्यरात्री नंतर आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबाग (संत्रा, मोसंबी ) आणि शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यां साठी ‘ दुष्काळात तेरावा महिना ‘ अशी स्थिती झाली आहे.
गुरुवारी रात्री आर्वी तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे.यात शेतीतील गहू आणि हरभऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.संत्रा आणि मोसंबी देखील गळून पडली आहे. नुकसानग्रस्त भागात माजी आ. अमर काळे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला. राज्य शासनाने यापूर्वी झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई दिली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळ बोलून दाखवले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1