निसर्गाच्या सानिध्यात जाजू इंटरनॅशनल स्कूलचा फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा
यवतमाळ / प्रतिनिधी
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती”
मानवाला सुखी संपन्न कृतार्थ जीवन जगण्याचा मार्ग प्रशस्त करून देणारा निसर्ग हा मानवाचा सर्वश्रेष्ठ, शक्तिशाली आणि उदार मित्र आहे हीच भावना ठेवून “फ्रेंडशिप डे” च्या निमित्ताने जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांनी निसर्गालाच आपला मित्र मानून फ्रेंडशिप डे साजरा केला. तसेच सिड्बॉलही बनविले.
याच निमित्ताने वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांसाठी “पाचधारा” येथे ट्रेकिंगचे आयोजनही करण्यात आले. जीवन जगण्यासाठी हिरवी संपत्ती अतिशय महत्त्वाची आहे. निसर्ग आपल्याला विविध चवीयुक्त पदार्थ, राहण्यासाठी घर, औषधोपयोगी वनस्पती, आयुर्वेदशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तसेच पृथ्वी, आकाश, पाणी, तेज, वायू ही पंचमहाभूते देतो. सोबतच विविध प्रदूषणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्नही करतो. मात्र मानव कृतज्ञ होण्याऐवजी कृतघ्न होऊन आपल्या स्वार्थासाठी निसर्गाचा दूरूपयोग करतो. याचा परिणाम मानवाला विविध संकटांना सामोरे जावे लागते. हीच बाब विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात समजावून देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जाजू सर, सचिव माननीय आशिषजी जाजू सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जाजू मॅडम यांनी “निसर्गाला मित्र मानल्यास, झाडे तोडण्याऐवजी झाडे लावल्यास, त्याचे संगोपन केल्यास, वाढत्या प्रदूषणाला आळा घातला जाईल” असे विचार यावेळी मांडले.
उपमुख्याध्यापक विजय देशपांडे सर, समन्वयक शिवाजी देशमुख सर, साबेरा बाटावाला मॅडम, क्रीडा शिक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती यावेळी होती.