क्राइम

दर्शना सोबत लग्नाचे स्वप्न झाले  भग्न  आणि त्यामुळे ….

Spread the love

पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

               एमपीएससी पास आणि आरएफओ पदावर निवड झोलेल्या दर्शना ने राहूल हंडोरे याला लग्नास नकार दिल्याने राहुल चे दर्शांना सोबत लग्न करण्याचे स्वप्न भंग झाले. आणि त्यामुळे त्याने दर्शना च्या हत्येचा कट रचत तिला  ट्रेकिंग च्या बहाण्याने राजगडवर नेले आणि त्याठिकाणी लग्नावरून वाद घालत नकार घंटा वाजवणाऱला  दर्शनाची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी क्लुप्तीचा उपयोग करत त्याला मुंबई येथून अटक केली आहे.

 पुण्यात एमपीएससी ची तयारी करणारा राहून हा तेथे एमपीएससी ची तयारी करण्यासोबत फूड डिलिव्हरी बॉय चे काम करत होता.दर्शांना आणि राहून ची जुनी ओळख होती. दर्शना चे आजोळ हे सिन्नरला होते . आणि सिन्नरला दर्शनचे घर आणि राहुल च्या मामाचे घर आजूबाजूला होते.त्यामुळे त्यांची ओळख होती. दर्शना आणि राहुल हे त्यानंतर पुण्यात आले. पुण्यात दोघांनी एमपीएससीची तयारी सुरू केली होती. पण राहुलला या परीक्षेत दोनदा अपयश आलं. तर दर्शना पहिल्याच प्रयत्नात पास झाली. ती फॉरेस्ट ऑफिसर झाली.

राहुलला दर्शनासोबत लग्न करायचं होतं. पण दर्शना फॉरेस्ट अधिकारी झाल्याने तिने राहुलला लग्नाला नकार दिला होता. दर्शनाच्या घरच्यांनी तिच्यासाठी मुलगाही बघितला होता. त्यामुळे राहुल संतापला होता. त्याचा राग त्याच्या डोक्यात गेला होता. त्यामुळे त्याने दर्शनाला गोड बोलून ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह धरला. तिला तो राजगडावर ट्रेकिंगच्या बहाण्याने घेऊन गेला आणि तिथे तिच्याशी लग्नाचा वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये वादावादी झाली. दर्शनाने लग्नाला ठाम नकार दिल्याने त्याने दगडाने ठेचून तिाच खून केला. सकाळी 8.30 वाजता राजगड किल्ल्यावर दोघे गेले होते. पण येताना तो एकटाच दिसून आला. रात्री 10.45 सुमारास राहुल एकटा परत आला होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो पोलिसांसमोर पोपटा सारखा बोलू लागला .दर्शनाची हत्या आपणच केल्याचंही त्याने सांगितलं. दर्शनाची हत्या का केली? त्या मागचं कारणही त्याने सांगितलं आहे. तसेच हत्या केल्यानंतर तो कोणत्या कोणत्या राज्यात लपला होता याची माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे.

 

 

राहुल हंडोरे याने दर्शना पवारचा खून केल्यानंतर तो घाबरून गेला होता. त्यामुळे तो पंजाबमधील चंदीगडला पळून गेला होता. त्यानंतर तिथून तो पश्चिम बंगालला पळून गेला होता. पश्चिम बंगालमध्ये राहिल्यानंतर तो दिल्लीत गेला. त्यानंतर गोव्यातून तो मुंबईत आला होता, असं सूत्रांनी सांगितलं. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी जाळं पसरलं होतं. पण तो पोलिसांच्या हातात येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी एक ट्रिक वापरली. राहुलला अटक करण्यासाठी पोलिसांनी थेट त्याच्या कुटुंबीयांचीच मदत घेतली. त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने राहुलला परत येण्याची भावनिक साद घालण्यात आली. त्यानंतर पोलिसांना राहुलचं लोकेशन कळलं आणि आणि पोलिसांनी त्याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close