सामाजिक

तहसीलदारांची पत्रकारां सोबत असभ्य वागणुक

Spread the love

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

तालुक्यातील तलाठी मंडळ अधीकार्यांच्या नोव्हेंबर महीण्यातील कालखंडातील आंदोलनकाळातील पगाराविषयीच्या बैठे आंदोलनाची बातमी संकलीत करण्यास गेलेल्या वर्तमानपत्राच्या प्रतीनिधींना तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी आपल्या पदाची गरीमा सोडत आपल्या द्वारे केलेल्या कर्तव्याची दखल बातमीमार्फत सार्वजनिक होऊ नये म्हणुन प्रतीनिधींसोबत उर्मटव्यवहार करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार घडलाअसुन तहसीलदार यांनी वर्तमानपत्राचे प्रतीनिधीसोबत केलेल्या वर्तवनुकीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अंजनगाव तहसिल मधील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी ३ नोव्हेंबर २०२३ ते २७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सामुहीक रजा आंदोलनात सहभागी झाले होते.सदर सामुहीक रजेच्या कालखंडातील रजा या अर्जीत रजेत परावर्तीत करुन आपल्या स्तरावर निकाली काढुन पूर्ण पगार काढण्यात यावा अशा सुचना निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडुन देण्यात आल्या होत्या,त्यास २२ दिवस पूर्ण होवून सुध्दा माहे नोव्हेंबर २०२३ पगाराचा विषय निकाली काढण्यात आला नसल्याने, तहसिलदार अंजनगाव सुर्जी यांचे दालनात ३ ते ५ वाजेपर्यंत बैठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळल्यावर वर्तमान पत्राचे स्थानीक प्रतीनिधी आंदोलनकर्ते यांचे बोलावण्यानुसार गेले असता तहसीलदार तथा आंदोलनक कर्मचाऱ्यांचे वार्तालाप सुरु असतांना तहसीलदार पुष्पा सोळंके (दाबेराव)यांनी वृत्तपत्र प्रतीनिधींना वरच्या आवाजात तुम्ही माझ्या परवानगी शिवाय कार्यालयात आले कसे व कोनताही प्रतीनिधी फोटो काढत नसताना फोटो काढले कसे म्हणुन हुज्जत घालुन विनाकारण ची दमबाजी दिली,त्यानंतर सदर प्रतीनीधींनी कर्मचाऱ्यांचे चर्चा झाल्यानंतर भेट घेऊन तहसीलदार यांना पगाराकरीता आंदोलन हा कार्यालयीन विषयासह कर्मचाऱ्यांचा हक्कावर गदाआणन्याचा विषय आहे व ही अन्यायकारक बाब आहे आणी अन्यायाचे ठीकानावर वृत्तपत्रांच्या प्रतीनिधींना परवानगीची गरज नसते असे खडे बोल सुनावल्यावर तहसीलदार यांनी तुम्हाला पटवारी संघाने बोलावले होते हे मला माहीत न्हवते,म्हणत बाजु सावरण्याचा प्रयत्न केल्यावर व कार्यालयातील वरीष्ठ समंजस अधीकाऱ्यांनी प्रतीनिधींची समजुत घातल्यावर प्रकरणावर पडदा पडला असला तरी तहसीलदार यांच्या व्यवहारावर पत्रकारांनी तिव्र नाराजी व्यक्त केली असुन पटवाऱ्यांनी पगाराविषयक आंदोलनात्क हत्यार का उपसले?निवासी उपजिल्हाधिकारी यांनी बावीस दिवसा अगोदर सुचीत करुणही तहसीलदार यांचे कडुन पटवाऱ्यांचा पगाराचा विषय निकाली काढण्यात का आला नाही?वरुड तहसील कार्यालयातील समुहीक रजा आंदोलनात सहभागी आंदोलनातील कर्मचाऱ्यांचा पगार निघतो तेथे अंजनगांवसुर्जी च्या कर्मचाऱ्यांना बैठे आदोलन करण्याची व तरीही विषय निकाली न निघाल्यास आंदोलनाचे पत्र का द्यावे लागते?यासर्व घटनाक्रमा मागील हेतु उघड होऊ नये म्हणुन विषयाला भरकटवीन्यास तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी पत्रकारांशी विनाकारण हुज्जत घालली असल्याचे बोलले जात असुन,तहसीलदार यांनी पत्रकारांबरोबर केलेल्या या अमर्यादीत व्यवहारासमंधी जिल्हाधीकारी, खासदार,आमदार यांना विषय अवगत करुण तक्रार दाखल करण्यात येईल असे उपस्थित पत्रकारांनी स्पष्ट केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close