राजकिय

उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय, हक्काच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन

Spread the love

 

पे

शिवसेना आक्रमक, महामार्गावर रस्ता रोको, वाहनाची लागली रिंघ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित.
नेर:- नवनाथ दरोई
शिवसेना उद्धव ठाकरे, युवासेना, महिला आघाडी, नेर तालुका शहर पदाधिकारी व शेतकऱ्याच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आस्मानी, सुलतानी संकटाशी लढा देत शेतकरी पुरता मेटकुटीस आला.अशातच कापसाला व सोयाबीनला भाव नाही, उत्पादन खर्च वाढलेला असतानाही, शेतकऱ्याच्या उत्पादन मालाला भाव मिळावा यासाठी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी यवतमाळ अमरावती महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठिया देऊन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी दोन्ही बाजूनी वाहानाची रीग लागली असल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवांनी नेर तहसीलचे नायब तहसीलदार इंगोले यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात कापसाला दहा हजार व सोयाबीनला 7000 हमीभाव जाहीर करावा, शेतकऱ्यांना रात्रीतला देण्यात येणारी वीज दिवसा आठ तास देण्यात यावी, फेलीवर झालेले डीपी चे ट्रांसफार्मर एकाच दिवशी बदलून द्यावे, अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, राष्ट्रीयकृत बँकेचे होल्ड केलेले शेतकऱ्यांच्या खात्यातील व्यवहार सुरळीत करावा, केंद्र शासनाने केलेला आयात करार रद् करावा, शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा,पिकाची आणेवारी पन्नास टक्कयाच्या आत करावी, वन्य प्राण्यांपासून शेतात झालेल्या नुकसानाची भरपाई देऊन प्राण्याचा बंदोबस्त करावा या मागणीचा उल्लेख दिलेल्या निवेदनात आहे. गेल्या वर्षीही शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेल्याने शिवसेनेचे नेते संजय देशमुख व कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या तोंडावर असताना नेर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जमीनीवर बसून चटणी भाकर खाऊन शासनाचा जाहीर निषेध केला होता. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close