शेती विषयक

शेतकऱ्याची आत्महत्या ;  आर्थिक नूकसान झाल्याने उचलले पाऊल

Spread the love
आर्वी / प्रतिनिधी 
            काही दिवसांपूर्वी शेतात लावलेल्या तुरीच्या गंजीला काही समाज कंटकाकडून आगीच्या हवाली करण्यात आल्याने आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्ये सारखे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना तळेगाव शा . येथे घडली आहे. किरण निबोळकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
          हाती आलेल्या माहिती नुसार किरण निबोळकर यांनी आपल्या 10 एकर शेतीत तुरीचे पीक लावले होते. तुरीची कापणी झाल्यावर निंबोळकर यांनी तुरीची गंजी लावली होती.  शेतातीळ या गंजीला समाज कंटकाकडून आगीच्या हवाली केल्या गेले . यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास असा पळून गेल्याने पुढे कुटुंबाचे कसे होईल आणि लोकांचे घेणेदेणे कसे निपटेल ?. अश्या विवंचनेत सापडलेल्या निबोळकर यांनी आत्महत्या केली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close