क्राइम
त्यांच्या वागण्यावरून रिक्षा चालकाला आला संशय आणि झाला खुनाचा उलगडा

विशेष प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगर
त्यांनी जीवनावश्यक सामान रिक्षात टाकले. शेजाऱ्यांनी विचारणा केली असता दुसरे घर शोधत असल्याचे सांगितले. जीवनावश्यक सामान रिक्षात असल्याने कदाचित ते खर बोलत असतील असे सगळ्यांना वाटले. पण ते ज्या रिक्षात प्रवास करत होते. त्या रिक्षा चालकाला त्यांच्या वागण्यावरून संशय आला आणि खुनाचे प्रकरण समोर आले.
प्रेमप्रकरणातून घरी सुरु असलेल्या वादाने इतके भीषण वळण घेतले की, एका तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. मात्र एका सतर्क रिक्षा चालकामुळे हा भयानक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदिनी राजू धिवरे, असे २१ वर्षीय मयत तरुणीचे नाव आहे, तर भारती उमेश साबळे असे मुख्य आरोपी असलेल्या आईचे नाव आहे. सह-आरोपी सावत्र पिता उमेश गोविंद साबळे आणि मामा अमोल गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदिनीचा विवाह झाला होता, मात्र पतीपासून विभक्त होऊन ती गेल्या तीन वर्षांपासून आईसोबत राहत होती. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे होते, परंतु आईचा या लग्नाला तीव्र विरोध होता.
१९ फेब्रुवारीला दुपारी घरात कोणी नसताना पुन्हा वाद उफाळून आला. वादादरम्यान नंदिनीने आईला विचारले, तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम केले तर काय हरकत आहे? या बोचऱ्या प्रश्नाने भारतीचा राग अनावर झाला आणि तिने समोर पडलेल्या रबरी पाईपने नंदिनीचा गळा आवळून तिची हत्या केली.
गादीत गुंडाळला मृतदेह, विल्हेवाटीचा असा होता कट
हत्येनंतर भारतीने पती उमेश आणि भाऊ अमोल यांना बोलावून घेतले. त्यांनी मिळून मृतदेह गादीत गुंडाळला. कोणाला संशय येऊ नये म्हणून घर बदलत आहोत असा बहाणा करत त्यांनी रिक्षात संसारोपयोगी भांडी पाण्याचे ड्रम आणि त्यासोबतच मृतदेह भरला. कन्नडच्या शेतात नेऊन मृतदेह गुपचूप गाडण्याचा त्यांचा कट होता




