हटके

पतिपत्नी भांडण मिटवून घेत होते गळा भेट आणि असा झाला शेवट

Spread the love

वाराणसी / नवप्रहार मिडिया

               पती पत्नीतील वाद हा काही नवा विषय नाही.लहानसहान कारणावरून भांडण आणि मग रुसवे फुगणे आणि नंतर मनधरणी ही सांसारिक प्रक्रिया आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.अशीच खटपट वाराणसी येथील नवरा बायकोत झाली. रागाच्या भरात बायको रेल्वे ट्रॅकवर गेली. तिची समजूत काढण्यासाठी नवरा सुद्धा तिच्या मागेमागे गेला. त्याने तिची समजूत काढली. आणि दोघांची गळाभेट झाली. इतक्यात मागून भरधाव आलेल्या ट्रेन ने दोघांना चिरडले त्यांत त्यांचा मृत्यू झाला.

            पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गोविंद सोनकर (30) याचा फळविक्रीचा व्यवसाय होता. पण त्याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी खुशबू (28) हिला तो दारूच्या नशेत मारझोड करायचा. त्यामुळे खुशबू कंटाळली होती.घटनेच्या दिवशी  सुद्धा गोविंद दारू पिऊन आला होता. त्यामुळे संतापलेल्या खुशबू ने गोविंद ने दारू सोडली नाही तर ती रेल्वे खाली जीव देईल असे बोलून ती बुधवारी रात्री सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील पंचकोसी रेल्वे क्रॉसिंग कडे गेली.

            पत्नी रागाने घरातून निघून गेल्यावर गोविंद सुद्धा तिच्या मागे निघाला तोपर्यंत खुशबू रेल्वे ट्रॅकवर पोहोचली होती. गोविंद त्या ठिकाणी पोहचल्यावर त्याने तिला समजावले आणि मिठी मारली. त्याने तिला तीन चार वेळा मिठी मारली.ही प्रक्रिया सुरू असतानाच त्या ट्रॅकवर एक गाडी धडधडत आली आणि त्यांना चिरडून गेली. त्यात त्यांचा मृत्यूऊ झाला.

गोविंद आणि खुशबू तीन मुलं आहेत. तिघेही आता अनाथ झाले आहेत. सर्वात मोठा मुलगा 6 वर्षांचा मुलगा आहे, तर 3 आणि 4 वर्षांच्या दोन मुली आहेत. गोविंद हा उदरनिर्वाहासाठी फळे विकायचा. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close