अखेर घाटंजी न. प. उर्दु शाळा नवीन इमारतीचे भूमिपूजन मूहूर्त सापडला
नगरोत्थान महाभियान योजना सन २०२२-२३ योजनेच्या अंतर्गत नगर परिषद प्राथमिक उर्दु शाळा घाटंजी इमारत बांधकाम करणे २.५० कोटी निधी मंजुर करून याचे भूमिपूजन आर्णि केळापूर मतदार संघाचे आमदार डॉ.संदीपभाऊ धुर्वे यांच्या अध्यक्षतेत व माननीय लोकनेते अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी घाटंजीतील अंजुमन इस्लाम कमेटी,जामा मस्जिद अध्यक्ष अब्दुल हफिज यांनी कूदळ मारुन उद्घाटन केले.शहरातील घाटंजी येथिल अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे पालक मागिल अनेक वर्षांपासून नगरपरिषद उर्दु शाळेच्या नवीन इमारतीसाठी निवेदन देऊन सुद्धा शाळा बांधकाम उद्घाटन मुहूर्त निघत नव्हता.जुनी इमारत जिर्ण अवस्थेत होती.मागिल दोन पंचवार्षिक पासुन उर्दु शाळेचे नविन इमारत या मुद्यावर सत्ताधारीने अल्पसंख्याक समाजातील लोकांचे मत घेऊन सत्ता भोगली परंतु उर्दु शाळेच्या नवीन इमारत बनवायला मूहर्त सापडे ना.शेवटी मुस्लिम समाजातील लोकांना १५ऑगस्ट २०२२ला उपोषणाला बसावे लागले होते. त्यावेळी घाटंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी सामंजस्य दाखवून उपोषण सोडवले होते.हि बाब लोकनेते अण्णा साहेब पारवेकर यांच्या पर्यंत पोहोचली त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांना उर्दु शाळेच्या नवीन इमारतीसाठी फंड उपलब्ध करून देण्यात बाबत व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य यावर अवलंबून असल्याचे सांगितले असता पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी आश्वासन दिले.आणि दिनांक ०७/०८/२०२३ला भुमीपुजन मूहर्त सापडे.या शाळा उभारणीत मध्ये आर्णि केळापूर मतदार संघाचे आमदार डॉ संदीप धुर्वे यांचाही सिंहाचा वाटा असल्याने नवीन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले.पालकमंत्री संजयभाऊ राठोड,आमदार डॉ संदीप धुर्वे, लोकनेते अण्णासाहेब पारवेकर,यांचे मुस्लिम बांधवांनी आभार व्यक्त केले.यावेळी एकता पत्रकार संस्थेचे उपाध्यक्ष कज्जुम कुरेशी,ॲड.सादीक खान,सैय्यद जावेद,गाजी खान,अकरम चव्हाण,फरीद नगरीया,सादीक पठाण,फरिद नगरीया,सुरेश डाहाके घाटंजी तालुका अध्यक्ष भाजपा,समाजसेवक सतिष मलकापुरे,अंकुश ठाकरे,माजी नगराध्यक्ष बालु खांडरे, समाजसेवक महेश पवार, नंदकिशोर डंभारे,चंद्रकांत इंगळे पाटील,मुज्जू पटेल,रिना धनरे,संदीप माटेभरत पोतराजे,प्रकाश खरतडे,कीरण राठोड,चेतन जाधव, पुंडलिक वाढई,राजु शेख,अमित महल्ले,राधिका गुंडावार,खांडरे ताई, यांच्या सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते