लव्ह जिहाद – अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून लग्न आणि धर्मपरिवर्तन
अहमदनगर / नवप्रहार डेस्क
अल्पवयीन मुलींना ,महिलांना हिंदू नाव सांगून त्यांच्याशी जवळीक वाढवायची. त्यांच्याशी मैत्री करण्याच्या नावावर त्यांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने अत्याचार करायचा. नंतर या क्षणाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची , कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करायचा. तिच्याशी बळजबरीने लग्न करून तिचे धर्मांतरण करून घ्यायचे हा प्रकार मागील काही वर्षांपासून ऐका विशिष्ठ समाजाच्या तरुणांकडून सुरू आहे.
या प्रकाराला बळी पडलेल्या तरूणी, मुली बदनामीच्या भीतीपोटी ही बाब कुणाला सांगत नाहीत. आणि मुकाट्याने अत्याचार सहन करतात. त्यामुळे अश्या लोकांची हिम्मत वाढत जाते. आणि एकामागून येक अशी प्रकरणे घडतात. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून लव्ह जिहाद चे असेच एक प्रकरण समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित तरुणीला शादाब तांबोळी याने सन २०२० पासून यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे यांच्या मदतीने वेळोवेळी पाठलाग करुन प्रेमाचे आमिष दाखवत मैत्री केली.
जवळीकीचा फायदा उठवून तांबोळी व चौघुले या दोघांनी पीडित तरुणीला फसवून मंचर (पुणे) येथे बोलावले.त्या नंतर चौघुले याच्या कारमधून (क्र. एमएच. १७, बीएक्स. ००९७) मंचरवरुन लग्नासाठी चाकण येथे नेले. यासाठी तिला पाण्यातून काहीतरी गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले.
तेथून मुंबईला पुन्हा दुसऱ्या वाहनाने पाठवून दिले. मुंबईत आल्यावर येथील अयाज पठाण याने सतत धमकावून तांबोळी आणि डित तरुणीला लॉजवर पाठवून दिले. तेथे तांबोळी हा तिला फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या घरच्यांना संपवून टाकेल अशी धमकी देऊन अत्याचार केले.
विशेष म्हणजे तिला न सांगता बळजबरीने पीडित लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्याचे पीडितेने जबाबात सांगितले.तब्बल पाच वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळज बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करुन अत्याचार केल्याचे जबाबातून समोर आले आहे.
यावरुन पोलिसांनी मुख्य आरोपी शादाब तांबोळी, सूत्रधार यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे व अयाज पठाण यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे.
दरम्यान, यातील म्होरक्या यूसुफ चौघुले याचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने श्रीरामपूर येथून त्याला अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र अद्याप तिघे पसार आहेत.