पतीची हत्या करून मृतदेहाचे केले सहा तुकडे ; मुंडके अजूनही गायब

बलिया (युपी) / नवप्रहार ब्युरो
अनैतिक संबंधाचा अंत फारच वाईट होतो.असे अनेक वेळा अनैतिक संबंधातून घातलेल्या घटनेने उघड होते. अनैतिक संबंधात महिला अथवा पुरुषाचा खून होतो. पण यानंतर देखील अनैतिक सबंध काही कमी होत नाहीत. अशाच अनैतिक संबंधातून पत्नीने पतीची हत्या करून प्रियकराच्या आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने मृतदेहाचे सहा तुकडे केलें. शिर धडावेगळे करून नदीत फेकून दिले. पोलिसाना शहरीराचे इतर अवयव सापडले आहेत. पण शिर अद्याप सापडले नसल्याने गोताखोरांच्या मदतीने मुंडक्याचा शोध घेत आहे.
दरम्यान, या हत्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणात मृताची पत्नी माया देवी, तिचा प्रेमी अनिल यादव आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश आहे. पोलिसांच्या चकमकी दरम्यान एका आरोपीच्या पायाला गोळी लागली.
पोलिसांनी 4 आरोपींना केली अटक
बलिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी सिकंदरपूर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या गावात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विहिरात मृतदेहाचे अन्य काही तुकडे पोलिसांना सापडले. राजेंद्र कुमार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर मृताची पत्नी माया देवी आणि तिचा प्रियकर अनिल यादव यांच्यावर संशयाची सुई फिरली..
कारण या तिघांमध्ये खूप जवळीक होती. सुरुवातीला या आरोपींनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पण कॉल डिटेल्स आणि अन्य साक्षीदारांच्या आधारावर त्यांचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी खाकीचा दणका दिल्यावर दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर या हत्याप्रकरणात सामील असलेल्या अन्य आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी आरोपी सतीश यादव आणि मिथिलेशच्याही मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी असा केला घटनेचा पर्दाफाश
घटनेचा खुलासा करत एसपी ओमवीर सिंह म्हणाले, माया देवीने पोलिसांना जबाब दिला की, तिचा पती राजेंद्र कुमार जे बीआरओ विंगमधून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ येत आहे. ते मुलीला आणण्यासाठी बिहारच्या बक्सर रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यानंतर पोलसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. याचदरम्यान खरीद गावात एका व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.
पण पोलिसांना मृत राजेंद्र कुमार यांचं मुंडकं सापडलं नाही. त्यानंतर पोलिसांनी माय देवीकडे कसून चौकशी केली. माया देवी आणि तिचा प्रियकर यांच्यावर संशय वाढल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आरोपींनी सांगितलं की, राजेंद्रचं डोकं घागरा नदीत फेकून दिलं. आता पोलीस गोताखोरांच्या मदतीने मुंडकं शोधण्याचं काम करत आहेत.