स्वातंत्रवीर सावरकरांवर बोलण्याची राहुल यांची लायकी नाही- आ. प्रताप अडसड यांचा घणाघात
ते गांधी नसल्याचा सुद्धा उल्लेख
धामणगाव रेल्वे, / प्रतिनिधी
ज्या राष्ट्रभक्ताला ब्रिटिश सरकारने २ वेळा जन्मठेप, काळ्या पाण्याची शिक्षा दिली, प्रचंड यातना दिल्यात भारत मातेच्या या पुत्राला पाण्यातून विस्टा खायला लावली ज्या सावरकरांचा संपूर्ण परिवार देशाकरिता संपला अश्या प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बोलण्याची राहुल गांधी यांची लायकी नाही मी सावरकर नाही असेच राहुल गांधी बोलले ते अगदी बरोबर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सारखे राष्ट्रभक्त राहुल गांधी होऊ शकत नाही सावरकर तर सोडा राहुल गांधी “गांधी” पण नाही राहुल गांधीने “गांधी” हे नाव उसणे घेतले आहेत राहुल गांधीचा इतिहास काढा ते गांधी आहेत का असा आमदार प्रताप अडसड यांनी प्रश्न उपस्थित केला? स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपात अडसड बोलत होते
ते म्हणाली की, काँग्रेसच्या किती नेत्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती तो इतिहास काँग्रेसच्या नेत्यांनी काढावा व वाचावा
मी सावरकर’ या नावाचे फलक हाती घेत व मुखाने राष्ट्रभक्ती तेरा नाम सावरकर… सावरकर…, सावरकरजी के सन्मान में, भाजप मैदान में, वंदे मातरम् अशा घोषणा देत शहरातील अमर शहीद भगतसिंग चौकातुन सुरू झालेली पायदळ रॅली कॉटन मार्केट गांधी चौक, मुख्य बाजार रोड टिळक चौक शास्त्री चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला .होय मी सावरकर समर्थक’ म्हणत या रॅलीमध्ये शहरातील तालुक्यातील सावरकर प्रेमी राष्ट्रभक्त भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते याप्रसंगी अर्चनाताई रोठे अडसड, मनोज डहाके,राजकुमार केला, नरेंद्र रामावत, उषा तीनखेडे, यांनी सावरकरांबद्दल विचार व्यक्त केले
आरोही लॉन येथे झालेल्या समारोप सभेत आ. प्रताप अडसड बोलतांना म्हणाले की, असीम त्याग, धीरोदात्तपणा आणि प्रखर देशभक्ती चे नाव म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांची महत्त्वाची भूमिका होती क्रांतिकारी देशभक्त अन अत्यंत प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले असल्याचे ते म्हणाले
यावेळी मंचावर संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल राळेकर, प. स. सदस्य नरेंद्र रामावत ,राजकुमार केला,अर्चनाताई रोठे, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा उषा तीनखेडे,सुनील साकुरे,बाळासाहेब शिरपूरकर मनोज डहाके, गिरीश भुतडा यांची उपस्थिती होती प्रास्ताविक गिरीश भुतडा यांनी व संचालन अशोक शर्मा यांनी केले