शेती विषयक

रासायनिक खते व कीटकनाशक औषधांच्या अती वापरामुळे शेतजमिनी झाल्या निकस

Spread the love

मानवी आरोग्यवर ही झाला दुषपरिनाम.

वरूड/तूषार अकर्ते

नव नविन तंत्र विकसित झाल्यामुळे आधुनिक काळात करत असलेल्या शेती पेक्षा आता होत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापरामुळे शेती करने अधिक सोपे झाले आहे.रासायनिक खते व फवारनीसाठी अती प्रमाणात वापरल्या जात असणा-या औषधीमुळे शेतजमीनी निकस झालेल्या दिसत आहे.शेतजमीनी निकस झाल्यामुळे पिकांच्या उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. व मानवी आरोग्यावर देखील याचे दुषपरिनाम जानवत आहे. वरूड तालूक्यातील शेतकरी आधी कापूस, तुर ,मिरची, भुईमूग, सोयाबीन , गहू, चना, ज्वारी, मका, अरंडी या सारख्या खरीप व रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत होता. परंतु खर्च वाढला असुन उत्पादन घटले असल्याने व जमिनी सुद्धा निकस झाल्याने हे पिके या भागातून नाहीसे झालेले दिसत आहे. आधीच्या काळात शेतक-यांजवळ बैल , गाय , म्हैस , बकरी , कोंबडी अशा पाळीव प्राण्याचा जोड व्यवसाय असायचा त्यामुळे शेणखत , लेंडीखत देखील होत असे. पंरतु चारा देणारे पिक नाहीसे झाल्याने शेतक-यांनी शेतीला पुरक असणा-या जोड व्यवसायाकडे सुद्धा पाठ फिरवली आहे. शेणखत व लेंडीखतामुळे जमिनी कसदार असायच्या व या जमिनीतुन उगणारे पिक सुद्धा चवदार असायचे.त्या वेळी शेतीला पोषक असणारे किटक जमिनीतच तळ ठोकून असायचे परंतु रासायनिक खते व विषारी फवारनीमुळे जमिनीला पोषक असणारे किटक व अन्य जिव हे पुर्णताह नाहिशे झाले असल्याने सुद्धा जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे मजुराच्या हाताचे काम कमी झाले आहे.या मुळे शेतकरी व शेतमजुर हे दोघेही अडचणीत आले आहे. शेती मध्ये जमिनीच्या मशागतीसाठी जसे की नांगरनी , वखरनी ,डवरणी , पेरणी या साठी बैल बंडीचा वापर होत होता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्या मुळे बैल जोडी वागवने शेतक-यांना न परवडणारे झाले आहे. चा-या अभावी गायी म्हशी फार कमी झाल्याने या भागातील दुध उत्पादक देखील फार कमी दिसुन येतात यातच शेतक-याप्रती असणारे सरकारचे ध्येयधोरन चुकीचे असल्याने आताचा युवा व तरूण वर्ग गावातील जमिनी सोडुन शहराकडे धाव घेत आहे. कारण सततची नापीकी , नैसर्गिक आपत्ती, विजेचा अपुरा पुरवठा, विविध कंपन्याकडुन होणारी शेतक-यांची फसवणूक, वाढतं शहरीकरण, बॅंका व सावकाराकडुन होणारी शेतक-यांची लुट या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता शेती करणा-यांची मानसिकता ढासळत जात आहे.त्या मूळे या भागातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील विविध भागात संत्रा बागा तयार केल्या असुन इतर पिकांनकडे मात्र पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close